फलटण ः समाज थोडासा घाणेरडया व्यावसायिक ज्या रूढी, चाकोर्या पडल्या आहेत.त्यातुन बाहेर आणला पाहिजे.जगणं ही आनंदाची गोष्ट आहे दडपणाची नाही.आता आपल्या सगळ्यांची जगणी ही दडपणात आहेत. वेगवेगळ्यात दडपणात.कशाची पण दडपणे आहेत.पाणी नाही.त्याचे दडपण शिक्षण नाही.त्याचे दडपण आणि सारखं आपलं चाललेलं असतं.लोक काय म्हणतील.कोण लोकं.तर मग काही लोक असे तयार करू की ते काहीही म्हणणारच नाही.असे परखड मत थोर विचारवंत राजन खान यांनी व्यक्त केले.
ते फलटण तालुक्यातील तरडगाव (अमलबाग) येथे आयोजित केलेल्या अक्षरमानवच्या एकदिवशीय शिबिर कार्यक्रमात बोलत होते.ते बोलताना असे ही म्हटले की,संवादाची जागा निर्माण करणे खुप गरजेचे आहे आणि तो जर एक सामाजिक संवाद झाला तर खुप प्रश्न सुटू शकतात.जात,धर्म हे लगेच मिटवाल तर ते लगेच शक्य होणार नाही.परंतु जात धर्म आणि देवांसह इतरांशी कसे जुळवून घ्यावे.आता तशी जुळवून घेण्याची ताकतही नाही.कारण आपल्यात एक गुर्मी आहे की मी दुसर्यांपेक्षा श्रेष्ठ आहोत.ती श्रेष्ठत्वाच्या नावाखाली संवादाची जागा ही निघुन गेली आहे
माणूसपणाची शिकवण सांगणार्या गौतम बुद्धाबद्दल सांगताना ते म्हटले की,थोडसं दुःख वाटतं की गौतम बुद्ध हे आपण पचनी पाडून नाही घेतला.दोन माणसे झाली.अडीज हजार वर्षाच्या प्रवासात.अडीज हजार वर्षा पूर्वी माणूस कसा जगला पाहिजे.हे कळलेला पहिला माणूस म्हणजे गौतम बुद्ध.अडीच हजार वर्षांनंतर दूसरा माणूस सापडला.माणूस कसा जगला पाहिजे.गौतम बुद्धाच्या पूर्ण दुसर्या टोकाला जाऊन बोलला.त्याचे नाव म्हणजे महात्मा फुले.
यावेळी राजन खान यांनी उपस्थित लोक यांच्याशी शेती, पाणी, दुष्काळ, साहित्य, कला, शिक्षण,पर्यावरण, जात धर्म, लिंग भेद आदि विषयांवर सखोलपणे संवाद साधला.लोकांनी चांगला प्रतिसाद दिला.तसेच अक्षरमानवचे पदाधिकारी श्रीकांत डांगे,राजेंद्र गलांडे, सुनील कांबळे, जावेदा जिंदगी यांनी संघटनेची ध्येय धोरणे समजून सांगितली.कार्यक्रमास विशेष सहकार्य कालिदास अडसुळ, गोपाळ सरक यांच्यासह सर्व सहकारी यांनी केले.तर कार्यक्रमास सातारा जिल्ह्यातील तसेच इतर काही भागातून अक्षरमानव संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
तरडगाव येथे अक्षरमानवचे एकदिवसीय शिबीर संपन्न
RELATED ARTICLES

