Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीसदाशिवगडावर अखेर पोहचले पाणी 

सदाशिवगडावर अखेर पोहचले पाणी 

मावळयांच्या दिव्य प्रयत्नांना यश, सदाशिवगड पाणी योजनेची चाचणी यशस्वी  कराड :  छत्रपती शिवाजी, महाराजांच्या  पदस्पर्शने पावन झालेल्या  ऐतिहासिक सदाशिवगडावर  पाणी  पोहोचावे, ही  अनेक पिढयांची इच्छा… ही इच्छा  सत्यात  उतरवण्याचे शिवधनुष्य सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानने उचलेले. उंच खडा डोंगर व  दर्‍या-खोर्‍यातील अनेक दिव्य पार करीत तब्बल 8 महिने प्रचंड मेहनत घेत मावळयांनंी 22 लाख  रूपयांची ही  योजना केवळ लोकवर्गणीतुन पुर्ण केली.  सोमवारी  सोमवती  अमावस्ये  दिवशी या योजनेची यशस्वी  चाचणी  घेण्यात आली.  एका रात्रीत सदाशिवाच्या मंदिरासमोरील  विहिर ओसंडली आणि कित्येक पिंडयंाची  इच्छा पुर्ण झाली. कराड तालुक्यातील सदाशिवगड हे भक्ती व शक्तीचे पीठ म्हणुनओळखले जाते.  गडावर असलेल्या  सदाशिवगाच्या दर्शनासाठी  दररोज  तसेच  दर सोमवारी भाविकांची गर्दी  असते.  महाशिवरात्र  व श्रावणातील  सरत्या सोमवारी  गडावर यात्रा भरते. यात्रेच्या निमित्ताने  हजारो भाविक  गडावर येतात. कराड शहर व परिसरातुन व्यापारासाठी  दररोज  गडावर येणार्‍यांची संख्या  मोठी आहे. गडावर पाणी  व्यवस्थापनासाठी  दोन विहिरी आहेत. पावसाळयात पडणारे  पाणी या दोन विहिरीत साठवले जाते. गडावर येणारे भाविक  व पठारावरील  झाडांसाठी हे वापरण्यात येते.  मात्र  नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान दोन्ही विहिरीतील  पाणी आटते. त्यामुळे पुढील सहा महिने गडावर पाणीटंचाई जाणवते. याचा सर्वाधिक  फटका गडावरील झाडांना  बसलो.  मावळा प्रतिष्ठानचे  सदस्य, गडप्रेमी, नागरिकांना  अक्षरश:   पायथ्यापासुनप्लास्टिक बाटल्यांमधुन पाणी नेऊन  गडावरील  झाडंाना घालावे लागले. ही पाणी टंचाई कायमस्वरूपी दुर करण्यासाठी  सदाशिवड मावळा प्रतिष्ठानाने गडावर पाणी योजना राबविण्याचा  निर्णय घेतला यासाठी  हजारमाची चे गडप्रेमी व शेतकरी   जयवंत मुळीक यांनी स्वत:ची विहिर गडासाठी  दिली. दिवाळी  पाडव्याला  योजनेच्या कामाचा शुभारंभ  झाल्यावर मावळयांनी  22 लाख  रूपयांची लोकवर्गणी जमा  करून  योजनेचे काम पुर्ण केले.  गेल्या पंधरा दिवसापासुन योजनेची चाचणी  घेण्याचे काम सुरू होते. मात्र उंच  डांेंगर व दोन  किलोमिटर अंतर यामुळे चाचणी यशस्वी होत नव्हती.  चाचणी घेताना  अनंत अडचणी  आल्या. मात्र मावळयांनी हार मानली.  नाही.  योजनेचे काम करणार्‍यां  कर्मचार्‍यंानी तर प्रयत्नंाची  तर पराकाष्ठा  केली. अखेर  सर्वांच्या प्रयत्नांना  यश आले. सोमवारी  अमावस्या होती.  या दिवशी  सायंकाळी  सहा वाजता चाचणीसाठी मोटर  सुरू करण्यात आली. सोमवारी रात्रभर  व मंगळवारी  दुपारी एक  वाजता  सदाशिवाच्या मंदिरासमोरिल  विहिर भरल्यानंतर मोटर बंद करण्यात आली. या योजनेमुळे  सदाशिवगडावर येणार्‍या  अनेक  पर्यटकांची तहान भागली जाणार आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular