वाई : धोम धरणाच्या उभारणीला पन्नास वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. कालव्यांवरील पुलाच्या उभारणीला तेव्हढाच कालवधी झालेला आहे, जवळपास शंभर पुलांची उभारणी कालव्याबरोबर झालेली आहे. धोम पाटबंधारे खात्याने या दीर्घ कालावधीत साधी कालव्यावरीलपुलांची व अंतर्गत साफसफाई सुध्दा केलीनाही.तालुक्यातील प्रत्येक गावांची नाळ या पुलांशी जोडलेली आहे, दररोज रहदारी करण्याचा हे पूल एकमेव मार्ग आहे, अतिशय गरजेचे असणार्या पुलांकडे या विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने परवा मेणवलीजवळील कालव्यावरील पूल कोसळला आहे, अशीच अवस्था दोन्ही बाजूच्या कालव्यावरील पुलांची झालेली आहे, कालव्यांच्याझालेल्या दयनीय अवस्थेवर प्रसार माध्यमांनी अनेक वेळा पाटबंधारे खात्याच्या कारभारावर शिंतोडे उडविले होते. पाटबंधारे खात्याने शासनाने कालव्यांच्या व पुलांच्या दुरुस्तीसाठी निधी न दिल्याचे कारण पुढे करत कालव्यांची कामे केलेली नाहीत.अनेक वेळा टीका झाल्यानंतर धोम पाटबंधारे खात्याने धोम पासून पाचवड पर्यंत सुमारे सतरा किलोमीटर अंतर कालव्याच्या दोन्ही बाजूला वाढलेली झाडे-झुडपे व अंतर्गत गाळ काढण्याचे काम पूर्ण केले परंतु कालव्यांची दुरुस्ती केली नाही. पुलांची दुरुस्ती न झाल्याने सध्या ते पूर्णपणे मोडकळीस आल्याचे चित्र वाई तालुक्यात दिसत आहे.व ते अपघातास निमंत्रण देत आहेत. पाटबंधारे खात्याने त्वरित या पुलांकडे गांभीर्याने घेवून दुरुस्ती साठी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी जोर धरू पहात आहे.
वाई तालुक्यात डावा आणि उजवा असे धरणाच्या दोन्ही बाजूने कालवे काढण्यात आले आहेत. या कालव्याव्दारे हजारो शेतकर्यांच्या लाखो हेक्टर जमिनी ओलिताखाली येवून शेतकर्यांचे राहणीमान बदलले. दोन्ही बाजूच्या सोडण्यात येणार्या पाण्यातून कर रुपी पैसा पाटबंधारे खात्याने अनेक वर्षांपासून गोळा केला आहे. तरीही गेल्या कित्येक वर्षात संबंधित खात्याने कालव्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.पाटबंधारे प्रशासन खात्याला कालवे दुरुस्तीला मुहूर्त मिळाला नव्हता. वाई तालुक्यात कित्येक वेळा कालव्याला भगदाड पडून कालव्याच्या शेजारी शेती असणार्या शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होवून सुध्दा या खात्याला जाग आली नाही. तात्पुरती डागडुजी करून गेली चाळीस वर्षे कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्याचे काम चालू आहे, शेतकर्यांनी कालवा सफाई बरोबर पुलांची दुरुस्तीची मागणी पुढे येत आहे.तसेच कालव्यावर असणार्या झुडपांमुळे श्वापदांचा त्रासही सहन करावा लागतो. जीव मुठीत घेवून शेतकर्यांना कालव्यावरून प्रवास करावा लागत होता, त्याही अनुषंगाने दुरुस्तीचे काम फायदेशीर ठरणार आहे.
वाई तालुक्यात कालव्यांवरील मोडकळीस आलेले पूल देताय अपघातास निमंत्रण
RELATED ARTICLES