साताराः सध्या शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून भाजप सरकारच्या कार्यकाळात मराठा समाजाला आरक्षण देण्यात यशस्वी झालो आहे त्याचबरोबर बीसी, ओबीसी व आर्थिक दुर्बल घटक, अल्पसंख्यांक अशा सर्वानाच यापुर्वीच आरक्षण देण्यात आलेले आहे. त्यामुळे जातीचे दाखले काढण्यासाठी सर्व तहसिल, प्रांत कार्यालये याठिकाणी मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे जातीच्या दाखल्यासाठी जलद कृती आराखडा तयार केला जाईल असे प्रतिपादन राज्याचे नवनिर्वाचित सामाजिक न्यायमंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी सातारा येथे विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिले.
आज सकाळी सातार्यात सामाजिक न्यायमंत्री डॉ.खाडे यांचे आगमन होताच त्यांचे मित्र डॉ. दिलीप येळगांवकर, भाजप नेते व कार्यकर्ते तसेच विविध निवेदन देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यानी मोठया प्रमाणात स्वागत केले. त्यापुर्वी श्यामप्रसाद मुखर्जी स्मृतीदिनानिमित्त डॉ.खाडे यांनी पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली वाहिली. राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात सामाजिक न्यायासाठी 12 हजार 303 कोटी रूपयाची तरतूद केलेली आहे. मागील वर्षाच्या तुलनेने 500 कोटी जास्त दिले असून सबका साथ सबका विकास हा नारा यापुढेही चालू राहणार असून संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योंजनेंतर्गत 1000 रूपयापर्यत वाढ केलेली आहे तसेच विधवा, परितक्त्या यांच्या वेतनात अपत्यांच्या संख्येनुसार एक अपत्य 1100, दोन अपत्य 1200 रूपये अनुदान मिळणार आहे. दिव्यांग हा समाजाचा एक घटक आहे त्यापैकी 80 टक्के दिव्यांगना घरकुल देण्यात येणार असून 100 कोटीची तरतूद केली आहे. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले असून तरतूद केली आहे. ज्येष्ठ नागरिक हे राष्ट्रीय संपत्ती आहे त्यांच्यासाठी विरंगुळा केंद्र उभारणी केली जाणार आहे.
सध्या जातीच्या दाखल्यासाठी मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. अधिकारी वर्गाने जात न पाहता क्रमवारीनुसार जातीचे दाखले वितरित करावे अशी मागणी कार्यकर्त्यानी केल्यामुळे जातीच्या दाखल्यासाठी जलद कृती आराखडा तयार केल्याने त्याची लवकरच अंमलबजावणी होणाार आहे असामाजिक न्याय विभागांतर्गत येणार्या वसतीगृह, आश्रमशाळा याठिकाणी निकृष्ट दर्जाचे जेवण व साहित्य तसेच इमारतीचे बांधकाम करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
या पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगरपालिका गट नेते मिलींद काकडे, दिपक पवार, नगरसेविका सिध्दी पवार, सुनील काळेकर, विजय काटवटे, राजेंद्र पवार, विकास गोसावी, धनंजय जांभळे, निलेश नलवडे, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी एहसास मतिमंद शाळेतील विद्यार्थी मेघना, शरयू यांची संस्थापक संजय कांबळे व अन्नपूर्णा लठे यांनी मंत्री डॉ.खाडे यांची भेट घडवून आणल्यानंतर मंत्री महोदय भावुक झाले. त्यांनी हीच पंढरी हीच काशी असे सांगून त्या चिमुकल्यांचे मनापासून स्वागत केलले. यावेळी विलास आंबेकर, डॉ.दिलीप येळगावकर उपस्थित होते.
जातीच्या दाखल्यासाठी जलद कृती आराखडा तयारः सामाजिक न्यायमंत्री डॉ.खाडे
RELATED ARTICLES