साताराः सातारा- जावली मतदारसंघाच्या एकत्रीकरणापासून या मतदारसंघात विकासकामांचा झंजावात सुरु झाला. आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या रुपाने जावलीला विकासपुरुष लाभला. आज संपुर्ण जावली तालुक्याचा कायापालट झाला असून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी नेहमीच विकासात्मक राजकारणाला प्राधान्य दिले आहे. जावली तालुक्यासाठी विकासरत्न ठरलेले आ. शिवेंद्रसिंहराजे आगामी विधानसभा निवडणूक जिंकणार यात कोणतीच शंका नाही. त्यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणायचे, असा एकमुखी निर्धार जावलीतील कार्यकर्त्यांनी मेळाव्यात केला.
आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत म्हसवे जिल्हा परिषद गटाचा शेते ता. जावली येथील दत्तकृपा मल्टीपर्पज हॉल येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, सदस्या सौ. अर्चना रांजणे, जावली पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय गावडे, सदस्य सौरभ शिंदे, सौ. अरुणा शिर्के, कांताताई सुतार, ज्ञानश्री उद्योग समुहाचे सचिव ज्ञानदेव रांजणे, माजी सभापती सुहास गिरी, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणिस डॉ. सुरेश शेडगे, मेढा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष पांडूरंग जवळ, अॅड. शिवाजीराव मर्ढेकर, माजी उपसभापती तानाजी शिर्के, हणमंतराव पार्टे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते व्यासपिठावर उपस्थित होते.
कार्यकर्ता मेळाव्यात डॉ. शेडगे, सौ. अरुणा शिर्के, दत्ता गावडे, अॅड. मर्ढेकर, पांडूरंग जवळ यांच्यासह माजी सभापती गिरी आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मानकुमरे यांनी मनोगत व्यक्त केले. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या माध्यमातून जावली तालुक्याचा विकासात्मक झालेला कायापालट याचा प्रामुख्याने उल्लेख करतानाच सर्वांनी बाबाराजे हाच आमचा पक्ष असल्याचे स्पष्ट केले. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या रुपाने शांत, संयमी आणि प्रेमळ नेतृत्व तालुक्याला लाभले असून त्यांना एक वेगळं वलंय आहे. त्यामुळे बाबाराजे जो शब्द टाकतील तो आमच्यासाठी प्रमाण असेल. गेल्या 10 वर्षात जावलीत मोठा बदल दिसतोय तो फक्त बाबाराजेंमुळे. त्यामुळे जावली तालुका कायमस्वरुपी बाबाराजेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असून आगामी निवडणूकीत विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी केला.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, मी नवखा उमेदवार असतानाही जावलीतील जनतेने मला चांगले मताधिक्य दिले. जावलीकरांच्या विश्वासास पात्र राहून मी प्रत्येक गाव, वाडी आणि वस्तीवर विकासकामे पोहचवली. जनतेने मला जे सुचवले ते काम मी पुर्णत्वास नेले. जावलीकरांनी माझ्यावर निस्सिम प्रेम केले असून हे प्रेम निरपेक्ष आणि निस्वार्थी आहे. माझे आणि जावलीतील जनतेचे उतट असे नाते असून जावलीतील जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जावू देणार नाही. आ. शिदे आणि माझे संबंध चांगले आहेत आणि पुढेही राहतील. मला जावलीकरांची सेवा करण्याची संधी मिळली आणि मी त्याचे सोने करुन दाखवले आहे. यापुढेही जावली तालुक्यात विकासाचा झंजावात कायम राहणार आहे. जावलीतील जनता प्रेम आणि आपुलकी कायम ठेवून माझ्या पाठीशी कायम उभी राहील याची मला नेहमीच खात्री आहे. जावलीकरांनी आपला आशिर्वाद माझ्यावर कायम ठेवावा, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले. संदीप परामणे यांनी प्रास्ताविक करुन आभार मानले. कार्यक्रमाला हजारोचा जनसमुदाय उपस्थित होता. गेली 30- 35 वर्षात म्हसवे गटात एवढा मोठा मेळाचा कधीच झाला नाही. हा गर्दीचा उच्छांक ठरला, अशी चर्चा सर्वत्र सुरु होती.
विकासरत्न श्री.छ.शिवेंद्रराजेच होणार जावलीचे आमदार
RELATED ARTICLES