(अशोक भोसले)
फलटण:
अश्व धावे अश्वामागे।
अवघा सोहळा पहावा डोळे भरूनी।
वैष्णव उभे रिंगणी।
टाळ, मृदुंगा संगे।
गेले रिंगण रंगुनी॥
या काव्य रचणेप्रमाणे वैष्णवांच्या दाटीत अश्वांच्या नेत्रदिपक दौडीला प्रारंभ झाला. टाळ, मृदुगांच्या गजरात विठ्ठल विठ्ठल नामाचा उद्घोषात या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण दु.4. वा पार पडले. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या भक्तांनी स्वयंस्फूर्तीने लावलेली शिस्तबध्द उभी रांग माऊलींच्या अश्वांनी घेतलेली दौड दिंडीतील वारकर्यांच्या पायांनी धरलेला ठेका, टाळ-मृदंगांच्या दाटीत रंगलेल्या फुगड्या अन हरिनामाचा गजर करीत विठ्ठलाला आळवीत भारावलेल्या वातावरणात ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारीच्या वाटेवरील आळंदी ते पंढरपुर मार्गावरील पहीले उभे रिेगण सोहळा चांदोबाचा लिंब (तरडगाव) येथे उत्साहात पार पडले.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा लोणंद येथील दिड दिवसांच्या मुकक्कामानंतर हरिनामाच्या गजरात आज दुपारी 2 वा.पुढील प्रवासास तरडगाव मार्गस्थ झाला. माऊलीचा लाखो वैष्णवजनांसह खंडाळा तालुक्यातून फलटण तालुक्यात प्रवेश झाला. फलटणच्या कापडगाव येथील सरदेच्या ओढ्यावर फलटण तालुक्याच्या वतीने स्वागत करण्यात आले.
पालखी सोहळ्याने फलटण तालुक्यात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलभक्त वारकर्यांना वेध लागले होते ते उभ्या रिंगणाचे. संपूर्ण पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण, रिंगणाच्या उत्सुकतेने वारकर्यांची पाऊले भराभर चांदोबाच्या लिंबाकडे पडत होती. सोहळा पुढे पुढे सरकत होता. रस्त्यांच्या दुतर्फा असणार्या स्थानिक नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जात होता. रस्त्याकडील बाजूला असणार्या शेतामध्ये ठिकठिकाणी भारूड व विठठल नामाचा गजर रंगला होता. यामध्ये लाखो वारकरी ज्या पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. या वरूणराजाने आपला आशिर्वाद त्या सरीने जमीनीकडे टाकला. यामुळे शेतकरी वारकरी भारावुन गेले होते.
‘घर तुटकेसे छप्पर, देवाला देवघर नाही, मला दादला नको गं बाई’ या संत एकनाथ महाराजांच्या भारूडात वैष्णव दंग झाला होता. भारूडात रंगत येत होती. सोहळा पुढे सरकत चांदोबा लिंब येथे आला.या ठिकाणी पंचक्रोशीतील भाविंकांनी पहिले उभे रिंगण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती दरम्यान माऊलीचां रथ चांदोबाचा लिंब येथे आला असता गर्दी असल्याने रिंगण लावताना त्रास होत असला तरी अखेर पालखी सोहळ्याचे चोपदार यांनी चोप आकाशाकडे धरताच सर्वत्र शांतता पसरली.कोणतीही सुचना न देता वारकर्यांच्या गर्दीतुन हजारो लाखो वारकरी दुतर्फा झाले व अश्व धावत येण्यासाठी जागा ठेवण्यात आली.रिंगण लावल्यानतंर रथापुढील 27 दिंड्यांमधून माऊलींचा अश्व पुजार्यांनी दौडत आणला.ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन अश्व मागील दिंड्यापर्यत नेल्यानंतर माघारी पळत आला. माऊलींच्या रथा जवळ अश्व आल्यांनतर सोहळा प्रमुुखानीं अश्वास पुष्पहार घालुन खारीक-खोबर्याचा नैवद्य दाखविला. त्यानंतर अश्वाने दौड घेतली.पुढे माऊलींचा अश्व व मागे स्वारीच अश्व अशी दौड पुर्ण झाली.अश्वास प्रत्यक्ष माऊलींचा आर्शीर्वाद असलेल्या भाविकांनी अश्व ज्या ठिकाणाहुन गेला आहे,त्याच्या पायाखालीची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली होती.अशा तर्हेने पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण उत्साहात पार पडले. या नंतर पालखी सोहळा तालुक्यातील पहील्या मुक्कामासाठी तरडगाव येथिल पालखी तळावर स्थिरावला. यावेळी पोलीस व महसुल प्रशासनाने चोख बंदोबस्त व सुख सोई पुरवील्या.