कराड : सदाशिवगड विभागातील 14 गावांत गेल्या तीन महिन्यांपासुन विस्कळीत वीजपुरवठा होत असल्याने उद्योजक, शेतकरी ग्रामस्थ वैतागले आहेत. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थी व गावातील पाणी पुरवठयाला बसत आहे. यामुळे संतापलेल्या सर्वपक्षीय, लोकपक्षीय, लोकप्रतिनिधी, संघटनांचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी ओगलेवाडी वीज वितरण कार्यालयात अतिरिक्त कार्यकारी अभियंता आजित नवळे यांनी घेराव घातला. यावेळी वीज वितरणाला निवेदन देण्यात आले. दोन दिवसांत सर्व अडथळे दुर करून वीज पुरवठा सुरळीत झाला नाही, तर गुरूवारी ओगलेवाडी कार्यवारी अभियंता अजित नवळे यंाना घेराव घातला. यावेळी वीज वितरणला निवेदन देण्यात आले. दोन दिवसांत सर्व अडथळे दुर करून वीज पुरवठा सुरळीत झाला नाही, तर गुरूवारी ओगलेवाडी कार्यलयावर महामोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. सदाशिवगड विभागातील हजारमाची, राजमाची, बाबरमाची, वनवासमाची, ओगलेवाडी, उत्तर पार्ले, निळेश्वर वडोली, विरवडे, करवडी, वाघेरी, मेरवेवाडी, पाचुंद, सुर्ली व कामथी, या 14 गावांत गेल्या तीने महिन्यांपासुन वीज वितरणाचा लंपडावाचा खेळ सुरू आहे. दिवसभरात जवळपास 20ते 25 वेळी वीज पुरवठो बंद, चांलु असल्याने शेतकरी व नागरिक वैतागले आहेत. संध्याकाळ नंतर तासन्तास वीजपुरवठा बंद राहत असल्याने विद्याथ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तर वारंवार खंडित होणार्या वीज पुरवठयामुळे ग्रामपंचयायतींच्या पाणी पुरवठयावरही परिणाम होत आहे. आहे. याबाबत वारंवार वीज वितरणकडे तक्रारी करूनही वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने परिसरातील संतप्त सर्वपक्षीय लोकप्रतिनीधी, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी वीज वितरणाच्या कार्यालयात जाऊन अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजितकुमार नवाळे यंाना घेराव घालुन प्रश्नांचा भडीमार केला. दोन दिवसांत 14 गावांतील वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर गुरूवारी वीज वितरणच्या ओगलेवाडी कार्यालयावर महामोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने, राष्ट्रवादी युवक, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, आर.पीआय युथचे जिल्हाध्यक्ष जयवंतराव विरकायदे, शरद कदम, हजारमाचीच्या सरपंच प्रतिमा लिमकर, उपसरपंच सतीश पवार, विरवडेचे सरपंच महेश सुतार , उपसरपंच अधिक सुर्वे, वनवासमाचीचे सरपंच अधिक सुर्वे, वनवासमाचीचे सरपंच महादेव माने, सुरेश खेचरे, दीपक लिमकर, धनाजी माने, पोपटराव साळुंखे, बळवंत माने, राजू काटवटे, सुर्यभान माने, कृष्णत काळे, मनोज माने, शंकर मदने, आबा लोकरे, संजय जाधव, राजु सुर्यवंशी, उदय करडे, योगेश झांबरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
वीज वितरणच्या अधिकार्याला सर्वपक्षीय घेराव
RELATED ARTICLES