मायणी :- (ता.खटाव जि.सातारा) महाराष्ट्र शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत येथील राज बहुद्देशीय सामाजिक संस्थेने विठोबा मंदिर च्या चांद नदी परिसरात वृक्ष लागवड करून आपल्या सामाजिक संस्थेचा वर्धापनदिन अनोख्या प्रकारे साजरा करून आपल्या सामाजिक उपक्रमांचा श्रीगणेशा केला आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजाराम कचरे,उपाध्यक्ष सतीश डोंगरे,जेष्ठ पत्रकार दिलीप पुस्तके,पांडुरंग तारळेकर ,रघुनाथ नायकुडे,तानाजी चव्हाण आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने तेहत्तीस कोटी वृक्ष लागवडीचे उदिष्ट ठेवून सर्वत्र झाडे लावण्याची मोहीम सामाजिक वनीकरण विविध संस्थांना बरोबर घेऊन सूरु आहे.या उपक्रमात राज सामाजिक संस्थेने सहभागी होत आपल्या सामाजिक उपक्रमाचा श्रीगणेशा केला असून संस्थे मार्फत फक्त वृक्ष लागवडी बरोबर त्यांची जोपासना केली जाणार असून मायणी व परिसरातील सामाजिक प्रशांची सोडवणूक संस्था व युवक सदस्यांच्या माध्यमातून करणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजाराम कचरे यांनी दिली.
मायणीचे जेष्ठ पत्रकार दिलीप पुस्तके यांनी संस्थेच्या वृक्षारोपन कार्यक्रमाचे कौतुक करताना युवक वर्गाने सोशल मीडियावर आपला वेळ व्यर्थ न करता आपले करियर घडवण्याकडे लक्ष देऊन समाजिकीकतेचे भानही ठेवावे असा मोलाचा सल्लाही दिला.
यावेळी संस्थेचे खजिनदार पै.नितीन पडळकर,सचिव पप्पू कचरे,संचालक किरण खांडेकर ,,वजिर ग्रुपचे अध्यक्षअमित ठोंबरे ,भुमाता ब्रिगेड चे अमोल भिसे व संस्थेचे सदस्य मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.