म्हासुर्णे: पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली,कोल्हापूर येथे आलेल्या महापुरामुळे हजारो कुंटुंबाचे सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करावे लागले.सातारा जिल्ह्यातील कराड,पाटण आणि इतर तालुक्यातील कराड पाटण कुंटुबांना मदतीची गरज होती. त्यामुळे जिल्हा अधिकारी यांनी जिवनावश्यक वस्तुंची मदत करावी असे आवाहन केले होते.
त्यात ब्लँकेट, धान्य, बिस्किटे, बिसलरी, कपडे यासह मदत करावी असे सांगितले होते.त्या आवाहानाला प्रतिसाद म्हणून म्हासुर्णे ग्रामपंचायत व श्रीराम विद्यालयाचे विद्यार्थी यांनी पुरग्रस्तांसाठी धान्य, कपडे, बिस्किट,ब्लँकेट, फरसाणा, बिसलरी पाणी ग्रामस्थांच्याकडुन जमा केले व ते संबधीत पुरग्रस्थांच्या ठिकाणी रवाना झाले.
यामध्ये म्हासुर्णे ग्रामपंचायत सरपंच सचिन माने, उपसरपंच सुहास माने, ग्रामपंचायत सदस्य तुषार माने, विठ्ठल माने, गुलाब वायदंडे, संगिता गुरव, नलिनी कुलकर्णी, गोरख माने, पाडुरंग माने, एम.पी.माने, सागर भोसले, महेश पवार, शरद माने, विनायक औंधे, ए.आर दबडे,तसेच शाळेचे सर्व विद्यार्थी व मुख्याध्यापक पी.व्हि.हांडे व सर्व शिक्षकांनी पुढाकार घेवुन मदत जमा केली ती सर्व मदत पुरग्रस्थांना प्रत्यक्ष जावुन वडगणे ,रजपुतवाठी,चिखली,कैर्ली याठिकाणी वाटप करण्यात आले असे सरपंच सचिन माने यांनी सांगितले आहे.
व्यापारी व ग्रामस्थाकडुन जिवनावश्यक वस्तुंची मदत
म्हासुर्णे मंगळवार पेठ तसेच सोसायटी व्यापारी संकुल व एस.टी.स्टँडवरील व्यापारी यांनी भरघोस अशी जिवनावश्क वस्तुची मदत केली तसेच ग्रामस्थांच्या कडुन धान्य व इतर वस्तुची मदत केली.
गावातील ग्रामपंचायतीने ती सर्व मदत प्रत्यक्ष पुरग्रस्त लोकांच्या पर्यत पोहचवले त्यामुळे व्यापारी व ग्रामस्थांमधुन समाधान व्यक्त होत आहे.
पुरग्रस्थांना म्हासुर्णे ग्रामस्थांकडुन भरीव मदत
RELATED ARTICLES