Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीमराठा आरक्षणाचा निर्णय काँग्रेस आघाडी सरकारमुळेच: आ. पृथ्वीराज चव्हाण

मराठा आरक्षणाचा निर्णय काँग्रेस आघाडी सरकारमुळेच: आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड: काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाला 16 टक्के व मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण मिळाले. आजही विद्यार्थ्यांच्या जात पडताळणी पत्रावर 15 जुलै 2014च्या अध्यादेशावन्ये असा उल्लेख आहे. असे सांगून देश व राज्याची निवडणुक प्रत्येक बूथमध्ये होते. त्यासाठी बूथ महत्वाचे आहेत. सूक्ष्म नियोजन लक्षात घेऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
काले (ता. कराड) येथे कराड दक्षिण मतदारसंघातील काले व येळगाव जिल्हा परिषद गटाच्या बुथ कमिटी सदस्य संवाद मेळाव्यात ते बोलत होते. आ. आनंदराव पाटील, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते, कराडचे नगरसेवक इंद्रजीत गुजर, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, कराड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, कराड शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र माने, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा विद्याताई थोरवडे, शिवराज मोरे, जखिणवाडीचे आदर्श सरपंच अ‍ॅड. नरेंद्र नांगरे-पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य शंकरराव खबाले, सदस्या मंगल गलांडे, पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटील, पंचायत समिती सदस्य नामदेवराव पाटील, सवादेचे माजी सरपंच बाळासाहेब थोरात, राजेंद्र यादव (आबा) बांधकाम सभापती, मलकापूर, संयोजक पैलवान नानासाहेब पाटील, सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते, नितीन थोरात, प्रशांत थोरात, उदय पाटील-उंडाळकर, वैभव थोरात, मारुती मोहिते, अ‍ॅड.ए.वाय. पाटील, यशवंतराव चव्हाण-पेरलेकर, सुरेश भोसले, आण्णासाहेब जाधव, वाठारचे सरपंच विलास पाटील, कालवडेचे विकास थोरात, कासारशिरंबेचे जयवंतराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. चव्हाण म्हणाले, कोणतेही नेतृत्व एका दिवसात पुढे येत नाही. जवळच्यांनी ते फुलवायचे असते. मला कराड दक्षिण मतदारसंघातील जनतेने केंद्रात मंत्री व राज्याचा मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचवले. मी स्वतः मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नव्हतो. मला पक्ष प्रमुखांनी या पदावर बसवले. त्या पदावर पोहचल्यामुळे मला तालुक्यात अठराशे कोटींची कामे करता आली. माझ्या राजकीय प्रवासाचा कराड तालुक्याला फायदा होत आहे. आमचे सरकार नसले, तरी अजून माझा एकही प्रश्न युती सरकार खाली ठेवत नाही. आजमितीला ग्रामीण विकासाचा निधी माझ्याएवढा कुणालाच मिळालेला नाही. डॉ. इंद्रजीत मोहिते म्हणाले, सर्वसामान्यांची नाळ काँग्रेसच्या मूळ विचाराशी जोडली पाहिजे. तरच सध्याची राजकीय बिकट परिस्थिती टाळता येईल. भावनात्मक राजकारणाऐवजी रचनात्मक राजकारण करणे महत्वाचे आहे. प्रत्येक बुथवर महिला, युवक, अल्पसंख्याक, वंचित तसेच सेवादलचे कार्यकर्ते क्रियाशील पाहिजेत. जयवंतराव जगताप म्हणाले, यशवंतराव मोहिते यांनी या मतदारसंघाला दिशा दिली. परंतु त्यांच्याच कुटुंबातील लोकांना यशवंतराव मोहितेंसरखा मनाचा मोठेपणा नाही. तुम्ही कशासाठी कुठे गेला आहात? हे जनता जाणून आहे. कितीही पैसे वाटू देत पृथ्वीराजबाबाच आमदार होणार आहेत. विरोधक आपल्यात फूट पाडत आहेत, याबाबत सावध रहा. नानासाहेब पाटील म्हणाले, यशवंतराव मोहिते यांचा कराड दक्षिण मतदारसंघ आहे. चिरमुरे व फुटाणे खावून मतदारांनी त्यांनी साथ दिली. तो मतदार कधीच विकला जाणार नाही. धनाजी देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजीराव मोहिते यांनी आभार मानले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular