केळघर : 5 जुलै रोजी झालेल्या आकस्मिक अतिवृष्टीमुळे चिंचणी ता. सातारा येथील एका गोभक्ताच्या गोशाळेचे फार मोठे नुकसान झाले असून त्यामुळे गाईंच्या निवार्याची व चार्याची बिकट समस्या निर्माण झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की चिंचणी ता. सातारा येथील गोभक्त शैलेंद्र सावंत यांनी देशी गाईचे गोमुत्र, शेण, दूध, दही, तुप (पंचगव्य) इ.चे आयुर्वेदात सांगितलेले औषधी गुणधर्म लक्षात घेऊन या गोउत्पादनांचा समाज्याला, शेतकर्यांना उपयोग व्हावा म्हणून दोन महिन्यांपूर्वी मोठ्या कष्टाने ही गोशाळा सुरू केली होती. या गोशाळेसाठी बॅक-कर्ज अद्याप मिळावयाचे आहे. त्यामुळे सावंत यांनी गाईंच्या पालनपोषणासाठी निवारा-शेड, चारा, पाणी इ. आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्याकरिता मित्र व नातेवाईकांकडून हात-उसने पैसे घेऊन 35 गाईंची व्यवस्था केली होती. परंतु दि. 5 जुलै 2019 रोजी रात्रंदिवस झालेल्या वादळी अतिवृष्टीमुळे गोशाळेच्या शेडचे पत्रे उडाले, साठवलेला संपूर्ण चारा भिजून वाया गेला. त्यामुळे पुन्हा व्यवस्था होई पर्यंत सुमारे आठवडाभर निवारा व चार्या अभावी गाईंचे भयंकर हाल झाले. आता शेडवर प्लॅस्टीकचे कागद टाकून तात्पुरता निवारा केला आहे. तथापि पुरेशा चार्या अभावी गाईंची उपासमार सुरू आहे.
अशा परिस्थितीत गाईंची उपासमार टाळण्यासाठी व ही गोशाळा पुन्हा व्यवस्थित सुरू करण्यासाठी चारा, खाद्य, पत्रे, लाकूड, इ. बाबींची त्वरित मदत मिळणे आवश्यक आहे. जरी शासकीय यंत्रणा तलाठी, सर्कल यांनी सदर घटनेचा पंचनामा केला असला तरी शासकीय मदत मिळण्यासाठी वेळ लागणार आहे.तरी आकस्मिक संकटामुळे अडचणीत आलेल्या या पवित्र कार्याला सामाजिक संस्था व सेवाभावी दानशूर नागरिकांनी वस्तुरुपाने अथवा रोख रकमेच्या स्वरूपात उदार हस्ते मदत करावी असे आवाहन गोशाळा चालक श्री शैलेंद्र सावंत यांनी केले आहे.
ईच्छूक दात्यांनी 7744864482 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा असे आवाहन करण्यात आले आहे .
अतिवृष्टीमुळे चिंचणी येथील गोशाळेचे मोठे नुकसान
RELATED ARTICLES