वाई : सार्वजनिक हित, सर्व जनतेच्या सुरक्षितता लक्षात घेऊन प्रशासनाने जुन्या कृष्णा नदी पुलावरून अवजड वाहनांस ये-जा करण्यास बंदी करून पुलाचे दोन्ही बाजूने ठराविक उंचीचे लोखंडी गरडर बसविले होते. जेणेकरून मोठी कोणतीही वाहने अनावधानाने सुध्दा पुलावरून जाऊ नयेत.मात्र या सर्व बाबी झुगारुन काही विघ्नसंतोषी वाहन चालकानी सदर लोखंडी गरडरला धडका देऊन दोन्ही बाजूचे अडथळे जाणीवपूर्वक पाडण्यात आले आहेत.
पोलीस प्रशासनाने खरतर या वाहनांचा छडा लावून पालिका प्रशासनाच्या मदतीने (चौकातील सीसी कॅमेरा मधून) कडक शासनकरण्याची गरज असताना त्याकडे साफ दुर्लक्ष व्हावे यासारखे दुसरे दुर्दैव नाही,सावित्रीनदीवरील दुर्घटनेची पुर्नावृत्ती होण्याची पोलीस प्रशासन वाट पहातंय-कि-काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत असून अज्ञाता विरुध्द कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी वाईकर नागरिक करीत आहेत. जनतेच्या जीवाशी खेळण्याच्या कृतीने संतापाची लाट उसळली आहे, तसेच त्वरित ते गर्डर बसविण्यात येवून अवजड वाहनांना कृष्णा पुलावरून जाण्यास बंदी करावी अन्यथा वाईतील सामाजिक संस्था, पर्यावरण प्रेमी, समाजसुधारक व वाईकर नागरिक पोलीस प्रशासन व वाई नगरपालिका प्रशासनास लेखी निवेदन देवून तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
वाईतील कृष्णा पुलाला एकशे पंवीस वर्षे झाल्याने तो वाहतुकीस धोकादायक बनला असून यावरून अवजड वाहनांची वाहतूक कायमची बंद करावी, अशी मागणी करण्यात येवून काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्ठी पावसामध्येकृष्णा नदीला महापूर आल्याने या पुलावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती, परंतु काही समाज कंटका कडून दोन्ही बाजूचे गर्डर जाणीवपूर्वक हटविण्यात आले, महाड मधील सावित्री नदीवरील झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता.
परंतु कोणतीही मोठी दुर्घटना घडल्याशिवाय पोलीस प्रशासनाला जाग येत नाही हेच खरे! पालिका प्रशासनाने अवजड वाहतुकीसाठी पर्यायायी व्यवस्था करावी मात्र नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा खेळ त्वरित थांबवावा अन्यथा वाईकर नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारतील अशी मागणी जोर धरू पहात आहे.
कृष्णा नदीच्या पुलावर बसविलेल्या गरडरचे अज्ञाताकडून नुकसान
RELATED ARTICLES