Saturday, June 21, 2025
HomeUncategorizedत्यांची संस्कृती पाठीत खंजीर खुपसून विश्‍वासघात करण्याचीच : डॉ. शालिनीताईंची शरद पवारांवर...

त्यांची संस्कृती पाठीत खंजीर खुपसून विश्‍वासघात करण्याचीच : डॉ. शालिनीताईंची शरद पवारांवर टीका

त्यांच्या स्वाभिमानाची व्याख्या तपासली पाहिजे * काकांच्या कर्तुत्त्वामुळे, पुतण्यावर, काका, मला वाचवा असे म्हणण्याची वेळ
सातारा : महाराष्ट्रााचा कथित स्वाभिमान असणारे पवारसाहेब, दिल्लींच्या तख्तापुढे कधी झुकले नाहीत परंतू सत्तेच्या लालसेपोटी त्यांनी अक्षरशः लोटांगण मात्र घातले आहे. त्युंच्या स्वाभिमानाची व्याख्या एकदा तपासून पाहिली पाहीजे, स्वतःपेक्षा कोणी मोठा होत असेल तर ते न बघवणार्‍या शरदरावांची संस्कृती स्वाभिमानाची सोडाच पण पाठीत खंजीर खुपसुन विश्वासघात करण्याची आहे. त्यूंचा भुलभूलैय्या आता संपूष्टात येत आहे. अनेकांचा घेतलेला तळतळाट त्यांना स्वास्थ बसु देणार नाही अशा जहाल शब्दांत माजी महसुल मंत्री, कोरेगांवच्या माजी आमदार आणि जरंडेश्वंर सहकारी साखर कारखान्याच्या प्रवर्तक डॉ. शालिनीताई पाटील यांनी माजी कृषी मंत्री, राष्ट्ररवादी कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचेवर जोरदार प्रहार केला आहे.
सध्या सुरू असलेल्या निवडणुकांच्या पाश्‍वरभूमिवर प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना त्याम्हणाल्या की, स्वाभिमान जपणारे शरदराव किंवा शरद पवार म्हणजे स्वाभिमान असं ज्यावेळी बोललं किंवा ऐकलं जाते त्या वेळी खरंतर खेद आश्चर्य वाटतेच. पण एखादी व्यक्ती बोलते काय आणि असते काय याचा फरकही अगदी स्पष्टपणे लक्षात येतो. शरद पवारसाहेबांनी त्यांचा स्वाभिमान अनेक वेळा व्यक्तीकेंद्रीत राजकारणासाठी खुंटीला टांगुन ठेवला आहे. सोनिया गांधीना परकीय म्हणून विरोध करणारे, स्वकियांमध्येच तंटे – बखेडे उभे करत होते. त्यावेळी हाच का त्यांचा यशवंत विचार, असा प्रश्न पडल्याधशिवाय रहात नाही. कालांतराने आपल्या भुमिकेवर ठाम राहतील ते पवारसाहेब कसले. वर्षा- दोन वर्षातच ज्यां ना त्यांनी परकिय ठरवले त्यांच्याच शेजारी जावून बसणारे पवारसाहेब स्वाभिमानाच्या गप्पा मारतात, त्यावेळी सामान्यांना किव वाटते. स्व.यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या व चव्हाणसाहेबांच्या नावाने सुरु असलेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि आम्ही संस्थापक सदस्या असलेल्या व वसंतरावदादा पाटील शुगर इंस्टी्टयुट या दोन संस्था आज मितीस स्वतःच्या खाजगी मालमत्ता असल्यासारखा ते वापरत आहेत. ज्याावेळेस म्हणजेच सन 1984 मध्ये, स्व. यशवंतराव चव्हाण अखेरच्या काळात आजारी होते, त्यातवेळी त्यांना भेटण्याची तसदी सुध्दा याच पवारसाहेबांनी घेतलेली नाही. मात्र मानसपुत्र म्हणून यशवंतरावांच्या नावावर मतांची भीक मागताना त्यांना कधीच लाज वाटली नाही.
सन 1978 मध्ये सत्ताकांक्षाने पछाडलेल्या पवारसाहेबांनी विश्वासघात करुन, तत्कालिन मुख्यमंत्री (कै.) वसंतरावदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून, पुलोद (पुरोगामी लोकशाही आघाडी) निर्माण केली आणि स्वतः कमी वयात मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली. पुढे अशी शपथ त्यांनी एकूण चार वेळा घेतली, परंतू आरक्षणाचं भिजत पडलेलं घोगडं काही केल्यात त्यांनी सुकवलं नाही आणि त्यांना सुकवताही आलं नाही. आरक्षणाचं गाजर दाखवून एखादा समाज आपल्याच दावणीला कसा जखडवून ठेवला जाईल इतकाच हेतु आरक्षणाच्या बाबतीत त्यांानी अंमलात आणला.
एखाद्याला हसत- खेळत किंवा खेळवत ठेवून राजकीयदृष्ट्या संपवणे हा तर त्यांचा आवडीचा छंद. आर्थिक आरक्षणाचा मुद्या जो की, तत्कालीन परिस्थितीत राष्ट्रावादी कॉग्रेसच्या अजेंड्यावर होता, त्याबद्दल आम्ही रान उठवले. क्रांतीला सुरुवात केली. त्यावेळी व्यक्ती म्हणून आमचा विरोध केला गेला. त्या व्यक्ती व्देषातूनच जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखान्याकडे यांची वाईट नजर गेली. दुसर्‍यांची शक्तीस्थाने- बलस्थाने ओळखून त्यावर प्रहार करायचा आणि त्याला जेरीस आणायचे यामध्ये त्यांचा विशेष हातखंडा. त्यांच्याच चेल्यांना पुढं करुन त्यांनी आमच्याबाबतीतही हेच प्रकार केले. त्यांच्याच कृपेने सभासदांचा जरंडेश्‍वर साखर कारखाना मात्र खासगी व्यक्तीने स्वाहा केला. जरंडेश्वेरच्या सभासदांच्या आणि कामगारांच्या रक्ताचे पाणी आम्हाला नुकतेच अजित पवार या महाशयांच्या डोळ्यात आम्हाला दिसले आहे. अजित पवार यांचा प्याद्यासारखा वापर करुन, राजगड सहकारी बँकेच्या माध्यमातुन 25 हजार कोटींचा घोटाळा यांनीच करायला लावला आहे. त्यामुळे अजित पवार यांचेवर काका, मला वाचवा अशी म्हणण्याची पाळी आली आहे. परंतु त्युंच्या दुर्देवाने आता काकाच्याही हातात काही राहीलेले नाही तर काकासुध्दा अडकणार आहे. कायद्याचे हात लांब असतात म्हणजे किती लांब असतात हे आता त्यांना समजणार आहे.
आज राज्य सहकारी बॅकेच्या तत्कालिन संचालक मंडळावर उच्च न्यायालयाच्या निर्देशाने, आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे, तसेच सक्त वसुली संचालनालयाने देखील (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. अनेक संस्थांना क्षमता नसताना कर्जे दिली. अनेक संस्थांच्या नावावर असलेल्या राज्य सहकारी बँकेच्या कर्जापोटी, या संस्था लिलावात काढल्या असून, लिलावाची रक्कम अशा संस्थांंच्या ताळेबंदावरील मालमत्तेच्या किंमतीवर झाले नाहीत. तर राज्य बँक व अन्य बॅकांच्या कर्जाच्या रक्कमेवर लिलावाची रक्कम ठरवणेत आली आहे. त्यामुळे काही संस्थांचे लिलाव जवळजवळ फुकटात करण्यात आले आहेत. पुन्हा हे लिलाव यांनीच घेतले आहेत. आता सविस्तर चौकशीत सर्व काही बाहेर येईलच. मात्र दोन-दोन गुन्हे दाखल आहेत. तरी सुध्दा माझा माथा उजळ आहे, कुठल्या चौकशीत मी अडकलो नाही असे निर्लज्यपणे सांगत सुटलेले पवारसाहेब, नाक कापलं तरी भोके आहेत असे समजत आहेत.
महाराष्ट्राचा कथित स्वाभिमान समजले जाणारे हेच शरदराव, ईडीने गुन्हा दाखल झाल्यावर, लगेचच चौकशी करवून घेण्यासाठी ईडी कार्यालयाकडे निघाले होते. तसेच विविध ठिकाणी ते ईडी का येडी असा उल्लेख करीत आहेत. ईडी म्हणजे काय हे एकदा छगन भुजबळ यांना खाजगीत विचारा म्हणजे नक्की काय ते कळेल. तसेच ईडीकडून ज्यावेळी बोलावले जाईल त्यावेळी त्यांना जावेच लागेल अन्यथा चिदंबरमचं जसं गठोडं वळवलं तसं तुमचं गठोडं वळवून कसुन चौकशी केली जाणारच आहे. प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ-काळ यावी लागते. आता ती आली आहे अशी सणसणीत चपराक देखील डॉ. शालिनीताई पाटील यांनी लगावली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular