सातारा : निवडणुकीच्या धामधुमीत पदयात्रा, कोपरा सभा, मेळावा यामुळे सर्वत्र प्रचाराचे वातावरण निर्माण झाले होते. आता पावसाचा मार असूनही मदतीसाठी कोणीही धावून आले नाही.प्रचारासाठी दारोदार भटकंती करणारे फिरकेना अशी अवस्था पाहून सातारकर मतदार चांगलेच गारठून गेले आहेत.
गेली दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने चांगलीच दमछाक केली आहे. भावी खासदार-आमदारांनी राजकीय पक्ष बदलावे तसे निसर्गाने वातावरणात बदल घडवून आणला आहे. गेली काही दिवस ऑक्टोबर हिट मुळे सातारकर त्रस्त झाले होते. प्रचारचा गोघांट व खोट्या आश्वासने मतदारांची करमणूक झाली असली तरी हाती काहीच लागले नाही. त्यातून परतीच्या पावसाने हजेरी लावून तारांबळ उडवून दिली आहे. दोन दिवसात सातारा, जावळी, पाटण, कराड, कोरेगाव,खटाव, वाई, खंडाळा, फलटण, महाबळेश्वर परिसरात 74.42टक्के पावसाची नोंद झाली आहे.
सातारा जिल्ह्यात शनिवारी सायंकाळ पासून पावसाचा प्रमाण वाढल्याने प्रचाराचा जोर थंडावला होता.काही उमेदवारांच्या समर्थकांनी हॉटेल, ढाबा व गाव पातळीवर कुपन पद्धतीने ठराविक पण, मर्यादित जेवण व दारूचीही व्यवस्था केली होती.त्याला अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. मोठ्या संख्येने खवय्ये सहभागी होतील असे वाटते होते. पण, काहींना पावसाने रोखून धरले तर काहींच्या घरे, दुकाने, टपरी, शेतात पाणी शिरल्याने त्यांना आधी घरचं नंतर प्रचाराच बघू म्हणण्या शिवाय गत्यंतर उरले नाही. या कालावधीत राजकीय पक्षांचे उमेदवार व प्रचारक मदतीला धावून आले नाहीत.मतदाना अगोदरच मतदारांना विसरणार्यांना मते कशी दयाची?असा संतप्त सवाल सातारा शहरातील गृहिणीने उपस्थित केला आहे.
सातारा नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये यांची सत्ता असताना गटार व रस्त्यावर सांडपाणी, सखल भागात साचलेल्या पाण्याने रोगराई पसरत आहेत. याकडे लक्ष नाही आणि विकासाचा गप्पा मारल्या जातात. बरे झाले पाऊस पडला आणि आमचे डोळे उघडले.. अशी ज्वलंत प्रतिक्रिया सौ.सीमा तुपे, सौ. जयश्री साळुंखे, रेहना बागवान व सतिश पवार यांनी व्यक्त केली आहे.
सातारा जिल्ह्यातील निवडणुकीच्या कामकाजाचे नाव सांगून शासकीय काही अधिकारी व कर्मचारी निवांत झाले आहेत.
पावसाने सातारला झोडपले असले तरी शासकीय आपत्ती व्यवस्थापन कुठे आहे?का त्यांना ही निवडणुकीच्या कामाला गुंतविले आहे?असा उपरोधात्मक प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याचा तरी जिल्हा प्रशासनाने विचार करावा अशी अपेक्षा सातारकरांना आहे.
सातारकरांना पावसाचा मार पण, फिरकेना कोणीही दारोदार
RELATED ARTICLES