वडूज/धनंजय क्षीरसागर : सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या माण-खटाव विधानसभा मतदारसंघात एकवटलेल्या सर्वपक्षीय विरोधकांना चितपट करत विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी तिसर्यांदा विजयश्री खेचून आणली. त्यांच्या विजयामुळे पुन्हा एकदा माणदेशात ङ्ग जय हो म चा गजर झाला. वेगवेगळ्या तीन चिन्हावर निवडून येवून त्यांनी विजयाची हॅट्रेटीक साधली.
लोकसभा निवडणूक झाल्यापासूनच माण विधानसभा मतदारसंघ कायम चर्चेत राहीला आहे. माढा मतदारसंघातील भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावणार्या आ. गोरे यांनी अपेक्षेप्रमाणे भाजपात प्रवेश केला. विधानसभा निवडणूकीची चाहुल लागल्यानंतर हा मतदारसंघ भाजपा, शिवसेना की रा.स.प. या मुद्यावरुन अनेक दिवस चर्चेचे गुर्हाळ सुरु होते. मात्र आपले सर्व कसब पणाला लावून आ. गोरे यांनी भाजपाची उमेदवारी मिळविण्यात यश मिळविले. त्यानंतर त्यांचे बंधू शेखरभाऊ गोरे यांनीही मोठ्या इरशेने शिवसेनेची उमेदवारी मिळविली. अश्या परस्थितीत काँग्रेस आघाडीतून कोण उमेदवार लढणार याबाबत औत्सुक्य होते. अश्यावेळी सर्वपक्षीय नाराज मंडळींनी एकत्र येवून आमचं ठरलयं च्या माध्यमातून तिसरी आघाडी उभारली. या आघाडीची उमेदवारी कोणाला द्यावयाची यासंदर्भात वडूज, दहिवडी, सातारा येथे अनेक बैठका झाल्या. त्यातून पहिल्यांदा सातारा येथे एका बैठकीत भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिलभाऊ देसाई यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. मात्र त्यांची उमेदवारी अनेकांना रुचली नाही. त्यानंतर श्री. देसाई यांच्यासह निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, हरणाई सुतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख या तिघांनी एकत्रीत अर्ज दाखल केले. याशिवाय खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदिप मांडवे यांनीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपला स्वतयत्र अर्ज दाखल केला. त्यानंतर एकच उमेदवार ठरविण्यासाठी मुंबई येथे बैठक होवून जेष्ठ नेते शरदराव पवार यांना उमेदवार ठरविण्याचे अधिकार देण्यात आले. अपेक्षेप्रमाणे पवार साहेबांनी प्रभाकर देशमुखांच्या नावाला पसंती दिली.
अर्ज माघारीच्या वेळी नाट्यमय घटना
श्री. प्रभाकर देशमुख यांना पसंती मिळाल्यानंतर संदिप मांडवे यांनी विनातक्रार माघार घेतली. मात्र रणजितसिंह देशमुख व अनिलभाऊ देसाई यांचे अर्ज माघारी घेताना बराच मोठा खल झाला. मोठ्या वादावादीनंतर माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी आपले कौशल्य वापरुन दोघांचे अर्ज निकालात निघाले. तद्नंतर श्री. देशमुख यांना पाठिंबा देण्यासंदर्भात ङ्ग आमचं ठरलयं म टिमने चार दिवसाचा कालावधी घालविला. होय नाय करत श्री. देशमुखांना घोड्यावर बसावे लागल्याने प्रचार यंत्रणा सुरु करण्यास मोठा विलंब लागला. दरम्यानच्या काळात दोन महिने अगोदरच आ. गोरे यांनी मतदारसंघातील बहुतांशी गावांना भेटी देवून संपर्क साधला. तिसरीकडे शेखर गोरे यांनीही वेगवेगळ्या मार्गातून युवक व महिलांना आकर्षिक करण्याचा प्रयत्न केला. देशमुख यांच्या प्रचारात दोन्ही तालुक्यातील मातब्बर नेते एकवटले होते. अनेक गावातील पारंपारिक विरोधकही एकाच व्यासपीठावर आल्याने त्यांची चांगलीच हवा झाली. त्यातली त्यात माण पेक्षा खटाव तालुक्यात मोठे फिलगुडचे वातावरण तयार झाले. मात्र हा सर्व कारभार सर्वसामान्य कार्यकर्ते व मतदारांना गृहीत धरुनच चालला होता. प्रचारात देशमुख यांच्या समर्थनार्थ ङ्ग मराठा तितोका मिळवावा म व ङ्ग एक मराठा लाख मराठा म असा आभास निर्माण करण्यात आला. प्रत्यक्षात मराठा समाजातील कार्यकर्ते आपापल्या गांव पातळीवरील सोयीनुसार गटा-तटात विभागले गेले. तर मराठा समाजाच्या हाकाटीने खडबडून जागे झालेल्या माळी व इतर ओ.बी.सी. प्रवर्गातील जाती-जमातींनी छुपा अजेंडा राबवत आ. गोरे यांच्या विजयासाठी आूुन जोरदार शक्ती पणाला लावली.
प्रचाराचे शेवटचे दोन दिवस निर्णायक
आ. गोरे यांची कोंडी करण्यासाठी वरवर जोरदार फिल्डींग लागली होती. कोणत्याही परस्थितीत त्यांचा पराभव होणार असे वातावरण होते. मात्र चानाक्ष गोरेंनी शेवटच्या दोन दिवसात निर्णायक खेळी केली. जयाभाऊंनी म्हसवड परिसरात जोर देण्याबरोबर माण तालुक्यातील इतर भाग तसेच संपुर्ण खटाव तालुक्यातील अनेक गावात सर्व सामुग्रीनिशी मतदारांशी थेट संपर्क साधला. तर शेखरभाऊ गोरे यांच्या कार्यकत्यांनी खटाव तालुक्यातील काही गांवे टार्गेट केली. याऊलट देशमुख साहेबांच्या समर्थकांनी खटावमध्ये वातावरण फार चांगले आहे. असे गृहित धरुन तळागळात रसद पुरवली नाही. त्यामुळे खटाव तालुक्यात मोठे मार्जीन मिळण्याची शक्यता असताना थोड्या मताधिक्यावर समाधान मानावे लागले. माण तालुक्यात आ. गोरे यांनी पहिल्या फेरीपासूनच मताधिक्यात वाढ घेतली होती. माणचा भाग असणार्या पंधराव्या फेरीपर्यंत सुमारे 15 हजारापेक्षा अधिक मताधिक्य होते. खटाव तालुक्याती मतमोजणी सुरु झाल्यानंतर हे मताधिक्य कमी झाले. तरीही सुमारे अडीच हजार मताच्या फरकाने त्यांचा विजय झाला.
निकालावर आक्षेप
ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली. 25 व्या फेरीअखेर जयकुमार गोरे यांना 88 हजार 783 तर प्रभाकर देशमुख यांना 83 हजार 526 मते मिळाली. 26 वी फेरी प्रशासनाने लवकर जाहीर केली नाही. त्यातच हा निकाल मान्य नसल्याचा तक्रारी अर्ज देशमुख समर्थकांनी निवडणूक निर्णय अधिकार्याकडे दिला. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत 26 वी फेरी व एकूण निकाल जाहीर झाला नाही. या प्रकारामध्ये देशमुख यांचे समर्थक शेवटपर्यंत फोनाफोनी करुन नक्की काय झाले याचा आढावा घेत होते. तर दुसरीकडे आ. गोरे यांच्या समर्थकांनी दहिवडी, वडूज येथे जल्लोषी मिरवणूकी काढल्या. वडूज येथील मिरवणूकीत तर कार्यकत्यांनी जे.सी.बी. मशिनच्या खोर्यातून गुलालाची उधळण केली.
निष्ठावंत भाजपाचे पासांग
आ. गोरे यांना भाजपाची उमेदवारी मिळाल्यानंतर माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगांवकर, जिल्हा उपाध्यक्ष श्री. देसाई यांनी वेगळी वाट चोखाळली. मात्र खटाव तालुकाध्यक्ष विकल्पशेठ शहा, माणचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब मासाळ, वडूजचे नगरसेवक अनिल माळी, वचन शहा, किशोरी पाटील, प्रदिप शेटे यांच्यासह दोन्ही तालुक्यातील भाजपाच्या छोट्या-छोट्या कार्यकत्यांनी पक्षाबरोबर राहण्याचा ठाम निर्णय घेतला. एका बाजूला आ. गोरे यांची बिनीचे शिलेदार त्यांना सोडून जात असताना या मावळ्यांची चांगली खिंड लढवली. त्यामुळे निवडणूकीत त्यांच्या मतांनी पासांगाची भूमिका बजावली.
माणदेशात पुन्हा एकदा जय हो चा गजर : आ. गोरे यांची विजयाची हॅट्रीक
RELATED ARTICLES