वडूज : शेतकर्यानो पिकाचे नुकसान झाले म्हणून हताश होउ नका. आम्ही तुमच्या सोबत आहोत. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करु. असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कातरखटाव येथे शेतक-याशी संवाद साधताना दिले.
प्रशासनाने शेतकर्यांच्या पिकांची पाहणी करून त्वरीत त्याचे पंचनामे सादर करावेत. तसेच शेतकर्यांना दिलासा म्हणून प्रति हेक्टरी पंचवीस हजार द्या असे म्हणत ते आम्ही करुन घेवू. असे ते म्हणाले.
आज कातरखटाव येथिल नामदेव कृष्णा बागल व दिगंबर यशवंत बागल यांच्या पिक नुकसानीची पाहणी करतेवेळी ते बोलत होते. या वेळी विधानसभेच्या उपसभापती निलम गोरे, माजी पालक मंत्री विजय शिवतारे, शिवसेनेचे गटनेते नितीन बानुगडे पाटील, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, शेखर गोरे, धैर्यशिल कदम, विभाप्रमुख संतोष दुबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ठाकरे पुढे म्हणाले, नुकसान झालेल्या सर्व शेतकर्यानी पंचनामा प्रक्रियेत सामील व्हावे. तसेच गावोगावी मदत केंद्र उभारुन आपल्या समस्या केंद्रावर सांगाव्यात. पिकविमा, कर्जमाफी, शेतकरी सन्मान निधी, दुष्काळी अनुदान या योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकर्यांना मदत केंद्रावर बोलावून याद्या तयार करा. त्या माझ्यापर्यन्त पोहेचवा. यानंतर त्या प्रलंबीत राहिलेल्या याद्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. आम्हास आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचे काही शेतकर्यांनी ठाकरे यांना सांगितले. यावर ठाकरे यांनी आपण खचुन जावू नका, वेळप्रसंगी शेतकर्यांसाठी आम्ही रस्त्यावरउतरु असे ठाकरे म्हणाले. शासकिय यंत्रनेमार्फत पिकाचे पंचनामे केले आहेत मात्र रब्बी हंगामाचे पीक मका, बाजरी, तुर, मुग आदी पिके पर्णपणे खराब झाली आहेत. तर त्याचे पंचनामे होईपर्यंत ती कुजुन गेलेली होती आणी शेतात पाणी असेल व पिके उभी असतील तरच पंचनामे केलेले आहेत. त्यामुळे याची फक्त दहा ते पंधरा टक्के शेतक-यांना भरपाई मिळू शकते. त्यामुळे याचा वस्तुस्थितीजन्य विचार करुन सर्व शेतक-यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी कणसेवाडी येथिल काही शेतक-यानी निवेदनाव्दारे केली.
पिकाचे नुकसान झाले म्हणून हताश होऊ नका, आत्महत्या करु नका:उद्धव ठाकरे
RELATED ARTICLES

