Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीश्रीनिवास पाटील यांची केंद्रीय विद्यालयाची मागणी

श्रीनिवास पाटील यांची केंद्रीय विद्यालयाची मागणी

सातारा: श्रीनिवास पाटील यांनी आज लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी लोकसभेत एक मुद्दा मांडला. महाराष्ट्रातले खासदार, विशेषतः शिवसेनेचे खासदार शेतकर्‍यांच्या नुकसानीचा प्रश्न उपस्थित करत असताना श्रीनिवास पाटीलही याच मुद्यावर बोलायला उभे राहतील असं वाटलं होतं मात्र तसं झालं नाही. पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी श्रीनिवास पाटील यांचं स्वागत केलं.
अनेक दिवसांनंतर तुम्हाला ऐकण्याची संधी या सभागृहाला मिळाली आहे, असं म्हणत त्यांनी श्रीनिवास पाटील याचं स्वागत केलं. पाटील यांनी मग पीठासीन अधिकार्‍यांचे आभार मानले आणि म्हणाले की देशात केंद्रीय विद्यालयांची संख्या जर पाहिली तर सगळ्यात कमी संख्या ही महाराष्ट्रात आहे.
सातारा जिल्ह्यात अनेक आजी-माजी लष्करी अधिकारी आहेत. अनेक शेतकर्‍यांच्या मुलांना लष्करात जाण्याची इच्छा असते. त्यांच्यासाठी सातारा जिल्ह्यात कुठेही एक केंद्रीय विद्यालय सुरू करण्यात यावं, ही नम्र विनंती करतो असं म्हणत त्यांनी आपलं लहानसं भाषण संपवलं.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular