औंध : खटाव तालुक्यातील गोपूज येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विजया जालिंदर घार्गे-देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली.पार्टीअंतर्गत समझोत्यानुसार तत्कालीन उपसरपंच सीमा संतोष पवार यांनी राजीनामा दिल्याने त्याजागी विजया घार्गे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
उपसरपंच पदाच्या निवडीची बैठक सरपंच उषा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक निर्णय अधिकारी आर.एम.जगताप, ग्रामसेविक सुनील राजगुरू,तलाठी उत्तम चव्हाण, तसेच ग्रामपंचायत सदस्य नितीन घार्गे,सीमा पवार,संजय गुरव, डॉ.संतोष जाधव ,पृथ्वीराज घार्गे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी उपसरपंच पदासाठी विजया जालिंदर घार्गे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडीनंतर नूतन उपसरपंच विजया घार्गे म्हणाल्या की,गोपूज गावच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर राहून सर्वांना विश्वासात घेऊन ग्रामपंचायतीचा कारभार करणार आहे,माझ्या गावाने माझ्यावर जो विश्वास दाखविला आहे त्यास मी सार्थ करेन.
त्यांच्या निवडीबद्दल माजी सरपंच बाबासाहेब घार्गे, संभाजी घार्गे, नारायण घार्गे, विजय खराडे, नंदकुमार घार्गे, जालिंदर घार्गे, प्रमोद घार्गे, प्रशांत जाधव,विनायक घार्गे, धनाजी घार्गे, दत्तूकाका घार्गे, विनोद खराडे, श्रीरंग घार्गे, दस्तगिर मुलाणी, सागर घार्गे आदींनी अभिनंदन केले.
गोपूज येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विजया घार्गे यांची बिनविरोध निवड
RELATED ARTICLES