पाटण: मणेरी येथील शेतकर्यांनी गेल्या तीन वर्षांपासून गावासाठी स्वतःच्या शेतातून रस्ता देण्याचे दात्रुत्व दाखवून सरासरी दहाफुटाचा रस्ता सोडला असताना देखील. गावातील गाव पुढार्यांनी महसूल विभागाच्या मंडलआधिकारी तलाठी यांना हाताशी धरून स्वतःच्या बडेजाव पणासाठी हा रस्ता पानंद रस्ता असल्याचे भासवून व तो मोकळा केल्याचा आव आणून वरीष्ठांची शबासकी मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असल्याचे संबधित शेतकर्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र ज्या शेतकर्यांनी स्वतःच्या शेताचे नुकसान करून गावासाठी रस्ता दिला त्यांचे आभार देखील मानण्याची तस्ती या संबंधित गावपुढार्यांनी अथवा मंडलाधिकारी, तलाठी यांनी घेतली नाही. अशा संतप्त प्रतिक्रिया हे शेतकरी देत आहेत.
याबाबत अधिक माहिती सांगताना शेतकरी म्हणाले मणेरी गावच्या शेजारी लागुन एक ओढा वाहतो. या ओढ्यातून पुर्वीची पायवाट आहे. ती आजही कायम आहे. या पायवाटेने जाताना-येताना ओढा ओलांडावा लागतो. पावसाळ्यात या पायवाटेची बिकट परस्थिती निर्माण होते. अशा परस्थितीत ओढ्यावर साकव पुल असल्यास गावातील नागरिकांचा शेतकर्यांचा मार्ग सुखकारक होईल. म्हणून संबधित लोकप्रतिनिधीकडे 2015-16 ला गावकर्यांनी साकव पुलाची मागणी केली.
हा साकव पुल नेहमीच्या ओढ्यातील पायवाटेपासून साधारण दोनशे फूट लांब बांधण्यात आला. साकव पुलाचे बांधकाम 2017 सालीच पूर्ण झाले. या ठिकाणी साकव पुलाच्या पुढे शेत जमीन असल्याने गावकर्यांनी एकत्र येऊन संबंधित शेतकर्यां सोबत बैठक घेतली व गावाच्या भल्यासाठी आणि सोयीसाठी आपण आपल्या शेतातून रस्ता द्यावा अशी मागणी तात्कालिन माजी सरपंच शंकर राऊजी बाबर-पाटील यांच्या समवेत केली. या मागणीचा विचार करून संबंधित शेतकरी आप्पा भागू सावंत, दिलीप नागु सावंत, शांताराम नागु सावंत, गणपत ज्ञानु सावंत यांनी गावासाठी दात्रुत्व दाखवून स्वतःच्या शेतातून दहा फुटाचा रस्ता देण्याचे तीन वर्षापूर्वीच मान्य केले.
साकव पुलाच्या पुढे या शेतकर्यांच्या शेतातून जेसीबी च्या साह्याने रस्ता करत आसताना शेताच्या बांधाचे, बांधावर असणार्या फळ झाडांचे कायमचे नुकसान झाले. जेसीबीच्या उत्खनाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे सर्व नुकसान या शेतकर्यांनी गावच्या भल्यासाठीच कायम सोसले. असे असताना शेताला लागुन शेती स्वरक्षणासाठी झुडपाचे उभे केलेले कुंपण कुठेतरी रस्त्यावरथोडे बाहेर आले. म्हणून हौसी काही गाव पुढार्यांनी मंडलाधिकारी, तलाठी यांना हाताशी धरून हा रस्ता पानंद रस्ता असल्याचे भासवून रस्ता मोकळा केल्याचा अविर्भाव आणला व त्याचे फोटो वर्तमान पत्रात देऊन वरीष्ठांची शाबासकी मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. असे गावासाठी स्वतःच्या शेतातून नुकसान सोसुन रस्ता देणार्या शेतकर्यांनी सांगितले.
गावासाठी नुकसान सोसणार्या शेतकर्यांचे आभार मानने दुरच मात्र त्यांच्या दात्रुत्वावर स्वतःची पोळी भाजून घेण्याच्या झालेल्या प्रयत्नावर मणेरी परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे.
गावासाठी स्वतःच्या शेतातून शेतकर्यांनी दिला रस्ता
RELATED ARTICLES