भुईंज : रिलायन्स व पी.एस.टोल प्लाझा कंपनीकडून वर्ष पुर्ण झाले तरी महामार्गावरील विद्युत दिवे स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत असल्याने गावोगावचे ग्रामस्थ व वाहन मालक यांच्यातून संतापाची लाट उसळत आहे. तर काही ठिकाणी वीज वितरण कंपनीच्या डोळयात धुळ फेकत मोठा घोटाळा केल्याचे चित्र पुढे येत आहे. दरम्यान येत्या महिनाभरात हे दिवे सुरू न झाल्यास भुईंज ग्रामस्थ तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान नुकतेच सातारा जावळीचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आनेवाडी टोलनाका बंद आंदोलन यशस्वी केले. रिलायन्स कंपनीने तातडीने उर्वरित कामे व रस्त्यांची दुरूस्ती याची लेखी ग्वाही दिल्याने आता तरी भुईंज येथील महामार्गावरील स्ट्रीट लाईट सूरू होईल का? का पुन्हा भुईंजकरांना नवे आंदोलन छेडावे लागणार अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
सध्या महामार्गावरील जिल्हयात टोलबंदी व महामार्गाला नसलेल्या सुविधा याविषयावर जोरदार मोहिम सुरू असतानाच जोशीविहीर भुईंज येथील महामार्गालगत व दुभाजकावर उभे केलेले दिव्यांचे खांब शोभेच्या वस्तू ठरत आहेत. आज उद्या हे दिवे लागतील या आशेने वाट पाहणार्या या ग्रामस्थांच्यावर पुन्हा एकदा अंधारच पसरला आहे. वास्तविक संबंधीत ठेकेदाराने हे खांब उभे केल्यानंतर लगेचच दिवे सुरू करणे बंधनकारक होते. परंतु उभे केलेले खांब काही ठिकाणी पडले सुद्धा तर काही खांबावरचे दिवे चोरीलाहि गेले. तर या दिव्यांच्यासाठी लागणारा विद्युत प्रवाह हा महावितरणने देणेची मंजूरी ही ठेकेदाराने फक्त कागदावरच घेतली असून गेली सहा महिने प्रत्येक एक किलोमीटरला एक रोहित्र (डिपी) उभे करून त्याद्वारे वीज प्रवाह सुरू करावा असा पत्रव्यवहार झाल्याचे हि निदर्शनास आले आहे. पी.एस.टोल प्लाझा या कंपनीने रोहित्रे उभे करण्यासाठी लागणारे कोटेशन नेवून आज पर्यंत कसलीहि कार्यवाही केली नसल्याने सदर दिवे लागत नाहीत असे एका जबाबदार अधिकारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान भुईंज कृष्णा पुल ते जोशीविहीर या दरम्यान दिवे केव्हा लागणार अशी प्रतिक्षा करणार्या भुईंज ग्रामस्थांच्यावर पुन्हा एकदा आंदोलनाचा पर्याय स्विकारावा लागतोय. याबाबत येथील महिला आणि विद्यार्थ्यानीनी एकत्रित येवून जयभवानी महिला सेवा भावी संस्थेच्या अध्यक्षा शैला पिसाळ व सचिव संगिता भोसले यांची भेट घेवून हे दिवे 31 डिसेंबर 2019 पर्यंत सुरू न झाल्यास रिलायन्स व पी.एस.टोल प्लाझा महावितरण यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
सदर आंदोलनाला विविध गावांचे जेष्ठ नागरिक व सेवाभावी संस्था यांनी पाठिंबा दिला असुन जिल्हा प्रशासनाने तातडिने संबंधीतातांना आदेश करावेत अशीही मागणी होत आहे.
भुईंज पोलीसांनी महिलांच्या विशेष सुरक्षितेसाठी निर्भया पथक़ बस स्थानकावर विशेष पथक व नुकतेच सीसी टीव्ही कॅमेरा सुरू करून सुरक्षितीतेत वाढ केली आहे. पण रात्रीच्या अंधाराला महामार्गाची स्ट्रीट लाईट चालू नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने याची गांभिर्याने नोंद घ्यावी व त्वरीत स्ट्रीट लाईट सुरू करावी अशी मागणी माजी जि.प.सदस्या राजनंदा जाधवराव यांनी केली आहे.
भुईंज येथील महामार्गावरील स्ट्रीट लाईट आता तरी चालू होणार का?
RELATED ARTICLES