कर्तव्य सोशल गुप, सागर मित्र अभियान सेवाभावी संस्थेचा अभिनव उपकम
सातारा: सातारा शहर कचरा आणि प्लास्टीक मुक्त व्हावे, यासाठी कर्तव्य सोशल गुपच्या माध्यमातून अनेक नाविण्यपुर्ण उपकम राबवले जात आहेत. शालेय मुलांना प्लास्टीक कचर्याचे दुष्परिणाम कळावेत आणि लहान वयातच त्यांना प्लास्टीक कचरा निर्मुलनाचा छंद जडावा यासाठी कर्तव्य सोशल गुप आणि सागर मित्र अभियान सेवाभावी संस्था दि. 2 जानेवारीपासून सातारा शहर परिसरातील विद्यार्थ्यांच्या साह्याने अनोखा व अभिनव उपकम राबवणार आहे.
कर्तव्य सोशल गुप आणि सागर मित्र अभियान या सेवाभावी संस्थेमार्ङ्गत शहर परिसरातील शाळांना प्लास्टीक मुक्तीसाठी आवाहन करण्यात आले असून या आवाहनाला लोकमंगल हायस्कूल नागेवाडी, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा, अजिंक्यतारा महाध्यमिक विद्यामंदीर शेंद्रे, भारत विद्यामंदीर संभाजीनगर, शाहुपूरी माध्यमिक विद्यालय, ज्ञानवर्धिनी हायस्कूल शाहुपूरी, इका इंग्लिश मिडियम स्कूल सातारा, नवीन मराठी शाळा, सौ. सुशिलादेवी साळुंखे हायस्कूल सातारा, सातारा इंग्लिश मिडियम स्कूल, अनंत इंग्लिश स्कूल, हिंदवी पब्कील स्कूल, दातार इंग्लिश मिडियम स्कूल, डॉ. जे.आर. डब्ल्यू आयरन अकॅडमी, अण्णासाहेब राजेभोसले प्राथमिक शाळा, छ. शाहू अकॅडमी आदी शाळांनी चांगला प्रतिसाद दिला असून नुकतीच या शाळेच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या शाळेतील विद्यार्थी स्वयंस्ङ्गुर्तीने शाळा व विद्यालयाच्या परिसरातील प्लास्टीक कचरा गोळा करुन ठेवणार आहेत. विद्यार्थ्यी दशेतच मुलांना स्वच्छता आणि कचरा निर्मुलनाची आवड निर्माण व्हावी. त्यांच्या कृतीतून पालकांना बोध व्हावा आणि आपला सातारा स्वच्छ, सुंदर आणि निरोगी व्हावा, यासाठी हा अनोखा उपकम राबवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी गोळा करुन ठेवलेला कचरा यामध्ये दूध पिशवी, तेल पिशवी, पाण्याची बाटली, प्लास्टीक पाऊच, किराणा मालासाठी वापरण्यात येणारे प्लास्टीक, चॉकलेट रॅपर, तुटक्य वॉटर बॅग, प्लास्टीक चप्पल, प्लास्टीक डबे, कंपास, फोल्डर, फूटपट्टी यासह प्लास्टीक पासून बनवलेल्या तुटक्या, निरुपयोगी वस्तू, सर्व प्रकारचा प्लास्टीक कचरा गोळा केला जाणार असून दर महिन्याच्या 2 तारखेला हा प्लास्टीक कचरा कर्तव्य सोशल गुपचे कार्यकर्ते वाहनातून स्वखर्चाने उचलून घेवून जाणार आहेत. तसेच उचलेल्या या कचर्याचे विघटनही सेवाभावी संस्थेमार्फत केले जाणार आहे. त्यामुळे खर्या अर्थाने प्लास्टीक कचर्याचे निर्मुलन होणार आहे.
या अभिनव उपकमाला शहरातील विविध शाळांनी प्रतिसाद दिला असून या सेवाभावी व सामाजिक उपकमात शहरातील सर्व शाळांनी सहभागी व्हावे आणि आपल्या शाळेचा परिसर आणि पर्यायाने आपले सातारा शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्याठी योगदान द्यावे. तसेच सुशिक्षित नागरिकांनीही प्लास्टीक कचरा इतरत्र न टाकता विद्यार्थ्यांकडे द्यावा अथवा कर्तव्य सोशल गुपशी संपर्क साधून प्लास्टीक कचर्याची योग्यप्रकारजे विल्हेवाट लावावी, असे आवाहन कर्तव्य सोशल गुपच्या संस्थापिका श्रीमंत छ.सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले आहे.
सातारा शहर परिसरातील शाळांचा परिसर होणार प्लास्टीक मुक्त
RELATED ARTICLES