Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीभटकी कुत्री मोकाटच; नियंत्रण ठेवण्यात प्रशासन अपयशी

भटकी कुत्री मोकाटच; नियंत्रण ठेवण्यात प्रशासन अपयशी

फलटण (शक्ती भोसले): शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली असून, यावर नियंत्रण मिळविण्यामध्ये पालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. भटक्या श्वानांच्या उपद्रवामुळे अनेक बालके, नागरिक जखमी झाल्याच्या घटना शहरातील विविध भागांमध्ये वारंवार घडत आहेत. शहरात शेकडो मोकाट कुत्री असल्याची माहीती संबधीत विभागाने काही महिन्यांपूर्वी दिली होती. ही संख्या वाढतच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
नागरिकांची बदलती जीवनशैली, राहणीमान यासह अनेक बाबी शहरात भटक्या कुत्र्यांच्या वाढीस कारणीभूत असून, पालिकेकडून होणारे दुर्लक्ष मुळे नागरी वस्तीत मोकाट भटक्या कुत्र्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शहराच्या चारही दिशांना झालेला विस्तार यामुळे नागरिकरणामध्ये मोठी वाढ झाली आहे.खाऊ गल्लीसोडुन इतरञ रस्त्यावर सर्रास लावले जाणारे चायनीजचे स्टॉल्स तसेच हॉटेलमधील अन्नपदार्थ रस्त्यावरच टाकले जात असल्याने ते खाण्यासाठी अनेक भटकी कुत्री गोळा होतात. रात्रीच्या वेळी मोकळ्या मैदानांमध्ये गर्दी करतात.
सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडलेले नागरिक तसेच रात्रीचे जेवण झाल्यानंतर फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांवर रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना गेले काही दिवसात घडत असतात. सध्या रस्त्यावर खेळणार्‍या लहान मुलांना तसेच महिला वर्गाला देखील या भटक्या कुत्र्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
काही दिवसांपूर्वी शहरातील सर्वच परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांनी दहशत माजवली होती व आहेत. त्या वेळी या भागातील अनेक नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. तसेच, आणखी एका घटनेत एका लहान मुलावर काही कुत्र्यांनी हल्ला केला. त्यामध्ये संबधित मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अश्या घटना होत असतानाच शंकर मार्केट, शिंपी गल्ली, मलठण, नारळी बाग, भडकमकर, हडको कॉलनी ,पवार गल्ली येथील काही भागांमध्येही भटक्या कुत्र्यांच्या त्रासाने नागरिक चांगलेच हैराण झाले असून, पालिकेने त्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
भटक्या कुत्र्यांना मारण्याची तरतूद कायद्यात नाही. त्यामुळे शहरातील रस्त्यावर असलेली कुत्री पकडण्याचे काम पालिका करते. भटक्या कुत्र्यांबाबत नागरिकांकडून तक्रार आल्यास त्याची दखल घेत पालिकेचे कर्मचारी संबंधित भागात जाऊन भटकी कुत्री पकडून त्यांना जवळच्या केंद्रात दाखल करतात. तेथे त्यांच्यावर पालिकेच्या माध्यमातून नसबंदीची शस्त्रक्रिया करण्याबरोबरच अँटी रेबीज लसही दिली जाते.
तीन दिवसांनंतर ज्या भागातून कुत्री पकडण्यात येतात; तेथेच त्यांना पुन्हा सोडण्यात येते. पालिकेने काही वर्षांपूर्वी शहरातील भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण केलेले होते, त्यात शेकडो भटकी कुत्री असल्याचे आढळून आले होते.
आता ही संख्या वाढून हजाराच्या घरात पोहोचली असण्याची शक्यताही शहरातील सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत. शहरातील मोकाट श्वानांना पकडून त्यांच्यावर अशासकीय संस्थांमार्फत श्वान संतती नियमन शस्त्रक्रिया करण्यात यावी.
फलटण नगरपालिकेचा कारभार म्हणजे एक ना धड बारभर चिंध्या अशी असुन मागील तीन वर्षातील नियोजन शुन्य कारभाराचा हा प्रकार असुन नगरपालीकेने कारभार न सुधारल्यास लवकरच पालिके विरोधात आंदोलन उभारणार
मिथेश उर्फ काकासाहेब खराडे – सामाजिक कार्येकर्ते

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular