मेढा: आपण काही ध्येय निश्चित करून त्याप्रमाणे वाटचाल करीत नसलो तर आपल्या जीवनाला काही अर्थ नाही. सध्या स्पर्धचे युग आहे. त्या स्पर्धत आपल्याला सिध् करुन उचित ध्येयापर्यंत पोहोचायचे असेल तर तेवढे कष्ट करण्याची ही क्षमता आपण निर्माण केली पाहीजे असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक पृथ्वीराज कदम यांनी केले
सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मेढा येथील महात्मा गांधी सार्वजनिक वाचनाल (तालुका अ वर्ग), व जावली करिअर अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अंतर्गत स्पर्धा परीक्षेचे बदलते स्वरूप या विषयावर मा पृथ्वीराज कदम (पोलीस निरीक्षक) यांचे मार्गदर्शन पर व्याख्यान महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालाच्या, स्व विजया थत्ते सभागृहात वाचनालयाचे अध्यक्ष सुरेश पार्टे यांचे अध्यक्षते खाली आयोजित करण्यात आले होते.
यावेळी जावली करिअर अॅकॅडमीचे संचालक संतोष कदम सर, आर.एस.कदम मॅडम, वाचनालयाचे मार्गदर्शक संचालक शामराव क्षीरसागर गुरुजी, वाचनालयाचे सल्लागार व मा सरपंच नारायणराव शिंगटे गुरुजी, जावली मित्र मेळाचे संस्थापक प्रविण विलास पवार, नवोदित लेखक कवी विश्वनाथ डिगे, फारुक शेख उपस्थित होते.
पृथ्वीराज कदम यांची नुकतीच पोलीस उपनिरिक्षक पदासाठी निवड झाली असून जावली तालुक्यातून स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणार्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होती.
याप्रसंगी श्री कदम यांनी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास कसा करायचा व अभ्यास क्रमाचे बदलते स्वरूप यावरती सखोल मार्गदर्शन केले. तसेच अभ्यास करताना येणार्या अडचणी व शंका याबाबत उपस्थित मुलांनी विचारलेल्या प्रश्नांचीही सविस्तर उत्तरे दिली. जीवनात कोणाच्याही हातापाया न पडता मान, प्रतिष्ठा, व पैसा मिळवायचा असेल तर जे वय अभ्यासाचे आहे. त्या वयातच जास्तीत जास्त अभ्यास करून ज्ञान मिळवा.
तसेच स्पर्धा परिक्षेबाबत भितीही बाळगण्याचे काहीच कारण नाही.योग्य दिशेने अभ्यास केल्यास यश तुमचेच आहे, असे सुचित करून अभ्यासाबाबत काहीही शंका आल्यास मला फोन करा मी तुम्हाला मार्गदर्शन करण्यास तयार असल्याचे श्री. कदम यांनी सांगितले.
प्रारंभी कार्यक्रमात सर्व प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पुजन करण्यात आले. वाचनालयाचे मार्गदर्शक संचालक शामराव क्षीरसागर गुरुजी यांनी प्रस्ताविक केले.
जावली करिअर अॅकॅडमीचे संचालक संतोष कदम सर यांनी प्रमुख मान्यवर मा पृथ्वीराज कदम (पोलीस निरीक्षक) यांची ओळख करून दिली, स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणार्या सुमारे दिडशे मुले व मुली यांनी मार्गदर्शना लाभ घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे सुरेश पार्टे यांनी केले. उपस्थित मान्यवर व जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आभार, मा. सरपंच, सल्लागार नारायणराव शिंगटे गुरुजी यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे सचिव माधनंजय पवार, कार्याध्यक्षा शोभा शेडगे, संचालिका नंदा काशिलकर, स्वाती दिक्षित, ग्रंथपाल आबा जंगम, सहा ग्रंथपाल आशा मगरे, लिपिक इमताज शेख यांनी प्रयत्न केले.
ध्येय नसेल तर जीवनाला काही अर्थ नाही: पो.उपनिरीक्षक पृथ्वीराज कदम
RELATED ARTICLES