वडूज: अंबवडे ते गोरेगाव रस्त्यावरील येरळा नदीपात्रावरील पूल अतिशय धोकादायक झाला असून तो पूर्व बाजूने पूर्णपणे खचला गेल्याने पूलास आरपार मोठे भगदाड पडले आहे. तो पूर्णपणे धोकादायक बनला आहे.तरी हा पुल तातडीने नवीन करावा यासाठी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर इंगवले यांनी तहसिलदार अर्चना पाटील यांना लेखी निवेदन दिले आहे. अंबवडे गाव ते गोरेगाव येथून मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.रस्त्यावरून मोठया प्रमाणात दळणवळण चालू असते.
शेतकरी विद्यार्थी, प्रवासी, स्कूल बस या रस्त्यावरूनच मायणी येथे जातात. पावसाळ्यात हा पूल एक दोन महिने येरळा नदीच्या पाण्याखाली जातो. त्यावेळी या रस्त्याची वाहतुक पूर्णपणे बंद असते. या पूलावरील पाण्यातून शेतकरी, शाळेतील मुले ये जा करतात यावेळी सर्वांची गैरसोय होते. तरी हा पुल तातडीने नवीन करून विद्यार्थी व ग्रामस्थांची सोय करावी.अशा प्रकारचे निवेदन अंबवडे चे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर किसन इंगवले सह ग्रामस्थ व विद्यार्थी, शेतकरी यांनी तहसीलदार यांना दिले आहे. हा पूलाच्या गैरसोयीचा प्रकार वेळोवेळी शासनाच्या निर्दशनास आणून दिला आहे.परंतू हा प्रश्न कोणी गांभीर्याने घेतला नाही.. तरी या संभाव्य धोक्याचा गांभीर्याने विचार करून नवीन पूल होण्यासाठी पावले उचलावीत.
आपण हा प्रश्न गांभीर्याने न घेतल्यास होणार्या संभाव्य परिणामाची जबाबदारी आपली राहील. वेळप्रसंगी उग्र आंदोलन करू असे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर इंगवले यांनी दिलेल्या निवेदनात म्हणले आहे.
अंबवडे गोरेगाव येथील येरळा नदीवरील धोकादायक पूल
RELATED ARTICLES