सातारा प्रतिनिधी :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन सुरू झाल्यापासून नागरिकांना सेवा देण्यासाठी पालिकेचे कर्मचारी झटत आहेत.मात्र, आपल्या प्रभागातल्या अडचणी व नागरीकांच्या हितासाठी नगरसेवकांना अत्यावश्यक सेवेचे ओळखपत्र नसल्याने घराबाहेर पडता येत नाही, अशी खंत काही नगरसेवक करत आहेत.एका नगरसेवकाने तर चक्क तीन दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची बोलणी खालली.त्यांनी तर पुन्हा बाहेर फिरला तर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला असल्याचे खात्रीपूर्वक वृत्त आहे.त्यामुळे शहरात लॉक डाऊन म्हणजे लॉक डाऊन अशी परिस्थिती आहे.
किती ही नागरीकाना सूचना केल्या तरीही रस्त्यावर येतातच. कोरोनाची कसली ही भीती नसल्याने सातारा जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार पालिका कार्यवाही करते.शहरात तर पोलिसांनी एवढा कडक कायदा राबवण्यास सुरुवात केली आहे.कोणी बाहेर दिसले की उठकबैठक, नाही तर गुन्हे दाखल करण्याचा सपाटा सुरू केला आहे.शहरात या लॉक डाऊनमध्ये बाहेर पडू नका असे आवाहन प्रशासन करत आहे.त्यानुसार शहरातल्या नागरिकांना समस्या भेडसावत असल्यास नागरीक तेथील नगरसेवकांना माहिती देतात.मात्र, आता नगरसेवकांना ही अत्यावश्यक सेवा याचे ओळखपत्र दिले नसल्याचे समजते.सातारा पालिकेच्या एकही नगरसेवकांकडे हे ओळखपत्र नसल्याने नागरिकांच्या हिताकरता घराबाहेर पडण्याची इच्छा असून ही पडता येत नाही,अशी काहींनी खंत व्यक्त केली.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एका नगरसेवकास भरला दम
स्वतः पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वारंवार आवाहन करत आहेत.घरातच रहा सुरक्षित रहा, असे.मात्र, त्यांना एक नगरसेवक रस्त्यावर काही कामानिमित्त दिसल्याने चांगले सुनावले. तीन दिवसापूर्वी ह्या नगरसेवकास बोलणी खावी लागली.त्याही पुढे जाऊन पुन्हा बाहेर दिसाल तर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिल्याचे खात्रीपूर्वक वृत्त आहे. नागरिकांच्या समस्या आल्या तरीही उगाच पोलिसांची झंझट नको म्हणून बहुतांशी नगरसेवक लॉक डाऊन म्हणजे लॉक डाऊन असे म्हणून बाहेर पडणे टाळून काळजी घेताना दिसत आहेत.
पालिकेच्या एकाही नगरसेवककडे नाही अत्यावश्यक सेवेचे ओळखपत्र
RELATED ARTICLES