सातारा :- जिल्हा व तालुका स्तरावर एकूण 23 ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरु केले असून गरीब व गरजू लोकांसाठी 11 ते 3 या वेळेत प्रती माणशी रु.5/-प्रमाणे थाळी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सदर 23 केंद्रावर अंदाजे 1800 गरीब व गरजू लोक भोजनाचा लाभ घेत आहेत.
पात्र रेशनकार्डधारकांना धान्य मिळण्यास अडचणी आल्यास तक्रार निवारण करणेसाठी अत्यावश्यक सेवा मदत क्र.1077 (हेल्पलाईन) वेळ सकाळी 9.00 ते रात्री 9.00 उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच जिल्हा पुरवठा कार्यालयातील दूरध्वनी क्र.02162-234840 यावरही तक्रारी नोंदविता येतील. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमी असताना धान्य वाटपात गैरप्रकार करणारे स्वस्त धान्य दुकानदार यांचेवर जिवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत गंभीर कारवाई करण्यात येईल, अशीही माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिली.