सातारा :- श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट व गुरुकुल एज्युकेशन सोसायटी सातारा यांच्या माध्यमातून कायम
स्वरुपी सातारकरांना सेवा देणाऱ्या दुर्लक्षित घटकातील दोनशे गरजू रिक्षा चालक व मालक यांना कर्तव्य भावनेतून धान्य व मास्कचे वाटप करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन परिस्थितीमध्ये गेले दोन महिने व्यवसाय बंद असलेने रिक्षा चालक व मालक अडचणीत
आले होते. राजधानी रिक्षा संघटना, अखिल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघ, अजिंक्य रिक्षा युनियन, भारतीय मजदुर संघ, सातारा जिल्हा रिक्षा युनियन या संघटनातील अत्यंत गरजू अशा दोनशे सभासदांना धान्य व मास्कचे वाटप करण्यात आले.
राजेंद्र चोरगे हे सुद्धा एकेकाळी रिक्षा चालवत असल्यामुळे रिक्षा चालक व मालकांचे व्यथा व अडचणी त्यांना चांगल्या माहिती असल्याबाबत सांगून ते याप्रसंगी म्हणाले की,प्रशासनाची नियमावली आपल्या सुरक्षेसाठीच असून त्याचे काटेकोर पणे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे.
या उपक्रमासाठी म्हसवडकर ज्वेलर्स, एस.के.देवी, वसंतशेठ जोशी, राईस स्पॉट व सक्सेस अॅबॅकसचे किरण पाटील यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संजय कदम,उदय गुजर,जगदिश खंडेलवाल,नितीन माने,राजुशेठ खंडेलवाल,दिपक मेथा,हरिदास
साळुखे,सुरेश पडियार,जगदिप शिंदे,सचिन भोसले उपस्थित होते.