महाबळेश्वर : आज संपूर्ण मानवजात कोरोना सारख्या अदृश्य संकटाबरोबर अस्तित्वाची लढाई लढत असताना सगळीकडे फ़क्त मृत्यूचे आकडे ,कोरोना बाधितांचे आकडे , विस्थापितांचे हाल यांचेच कानावर येत असताना कडक उन्हात गार हवेची झुळूक गोडवा देऊन जाते .अशीच एक बातमी मनाला गारवा देऊन जाते . आधुनिक युगाची सुरवात आली , घोडे जाऊन गाड्या आल्या. पायी पायी जाणारी माणसे लालपरीने जाऊ लागली.ज्या पूर्वीच्या पाऊलवाटा निसर्गात विरून गेल्या एकरूप झाल्या पण त्याच्या काही पाऊलखुणा मागं राहतात अशीच एक ऐतिहासीक वारसा जपण्याचा येथील युवकांनी केलेला पाहायला मिळतो.
क्षेत्र महाबळेश्वर च्या पश्चिमेस साधारण २ते ३किमी अंतरावर असणाऱ्या एका पुरातन किसणीचे कुंड या नावाने ओळख असलेल्या या कुंडाची येथील क्षेत्र महाबळेश्वरच्या स्थानिक युवकांनी एकत्र येत त्याचा कायापालट केलाय.
प्रतापगडाच्या पायथ्याला लागून असलेल्या चंद्रराव मोरे यांचे जावळी लागते . येथून पूर्व दिशेने एक डोंगर चढून गेल्यावर क्षेत्र महाबळेश्वर चे ब्रम्हारण्य ची हद्द सुरू होते. या हद्दीला लागूनच एक पौराणिक ठिकाण आहे. पूर्वी पासूनच निसणीचे कुंड या नावाने संबोधले जाणारे हे ठिकाण आज मात्र काळाच्या ओघात हरवून चाललंय. ऐतिहासिक महत्त्व असलेले या कुंडाने कित्येक वर्षे अनेकांची तहान भागवणाऱ्या या कुंडाची अवस्था खूपच बिकट झाली होती . संपूर्ण कुंड मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते आणि जनावरांना देखील होत असलेले पाण्याची गैरसोय ही बाब जेव्हा येथील स्थानिक युवकांच्या लक्षात आली अन त्यांनी या ठिकाणी जाऊन या कुंडाचा गाळ काढणे सुरू केले. आणि त्याला पूर्वीची रूप मिळवून दिले.
असे निसणीचे कुंड येणाऱ्या जाणाऱ्या यात्रेकरूंची प्रवाश्यांची बिस्लरी सारखे मिनरल वॉटरच काय पण साधे पाणी मिळणे दुरापास्त असताना तहान भागवत होते . पण काळाच्या ओघात प्रवासाची साधन उपलब्ध झाली ,रस्ते आले जीव काढणाऱ्या उरात धटकी भरवणाऱ्या या डोंगराकडे कोण येईनासे झालं . माणसान सोडलं की निसर्ग त्याला सामावून घेतो.असच काहीस दृश्य पाहायला मिळत .वाटेच्या खुणा पुसट झाल्या, पाण्याचे कुंड हळूहळू गाळ साचत गेल्याने ते पूर्ण भरून गेलं.बांधकामाच्या दगडांची पडझड झाली . बराच काळ ही परिस्थिती अशीच होती राहिली असती पण या कुंडाकडे जयवंत बिरामणे, निखिल कांबळे, प्रमोद कात्रट, विलास कांबळे, प्रकाश कात्रत, संदीप बिरामणे या युवकांचे लक्ष गेलं आणि ही मिटत चाललेली ही धरोहर जपाय हवी या जाणिवेन ते एकत्र आले . कोरोनाच्या या काळात सोशल डिस्टन्सिंग नियम पाळून हा कुंड त्यांनी गाळ काढून स्वच्छ केला . शक्य तेवढी दुरुस्ती केली आणि शेकडो वर्षे ज्यांन लोकांची तहान भागवली असेल अशा शिवकालीन या टाक्याचं पुनर्जीवन केलं .
कॉम्पुटर ,मोबाईल ,फेसबुक या ऑनलाईन जगात जगायला शिकलेल्या आजच्या तरुण पिढीने केलेला हा उपक्रम स्तुत्य आणि अनुकरणीय मानावा लागेल.आणि अजून काही दुर्लक्षित असलेली अशी ठिकाण पुनर्जीवित करण्याचा त्यांचा मानस आहे.
आपण इतिहास जपला तरच उद्या आपली भावी पिढी आपला इतिहास जपणार आहे.फास्ट फूडच्या जगात हा विचार रुळायला अवघड असला तरी या तरुणांसारखे आशेचे किरण आहेत तोवर आपण पुसले जाणार नाही याची शाश्वती आपण देऊ शकतो
क्षेत्र महाबळेश्वर जवळील दुर्लक्षित कुंडाचा स्थानिक युवकांनी केला कायापालट
RELATED ARTICLES