पाटण :- देशावर महाभयंकर आलेल्या कोरोना संकटाला सामोरे जाण्यासाठी गाव, शहर, महानगर याठिकाणी आपले कोरोना योध्दा रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. या योध्दांच्या पाठीमागे खंबीर उभे राहून त्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या हेतूने व कोरोना पासून बचाव करण्याचा हेतूने अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशाताई, सफाई कर्मचारी, आरोग्य सेवक, पोलीस जवान यांना भारत सरकार आयुष मंत्रालय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – जनकल्याण समिती कराड, सुखायु फाऊंडेशन कराड व पाटण शहर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पाटण शहरातील कोरोना योध्दांना प्रतिकार शक्ती वाढविण्याचा आयुष काढ्याचे गेले सहा दिवस वाटप करण्यात आले.
पाटण शहरातील नगरपंचायत कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, तहसीलदार कार्यालय व पोलीस स्टेशन येथे या आयुष्य काढ्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सेवक सहा दिवस वाटप करत होते. हा काढा भारतीय व घरघुती पदार्थातील सुंठ, मिरे, दालचिनी, ज्येष्ठमध, हळद व तुळशीचे पाने या पासून तयार केला गेला होता. दररोज सकाळी अर्धा कप काढा पिल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढविण्याबरोबर इतर व्याधीवर उपयुक्त असून कोरोना युद्ध जिंकण्यासाठी हा आयुष्य काढा प्रत्येकाने घ्यावा असे डॉ. मिहीर वाचासुंदर यांनी यावेळी सांगितले.
कोरोना योध्दां टिमच्या स्वास्थ्यासाठी भारत सरकार आयुष मंत्रालय यांचे विद्यमाने व राष्ट्रीय स्वयं संघ, जनकल्याण समिती कराड यांचे मार्फत पाटण शहर राष्ट्रीय सेवक संघाच्यावतीने कोरोना विरोधी आयुर्वेदीक काढा सुशांत शिंदे, निलेश फुटाणे, अनिल बोधे, संजीव देशमुख, रत्नदिप गुरूव, विश्वजीत देशमुख, राम शिंदे, प्रसाद घाडगे, वैभव नायकवडी, विकास सूर्यवंशी, रोहित जगताप, प्रथमेश जंगम यांनी नगरपंचायत कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, तहसीलदार कार्यालय, पोलीस स्टेशन पाटण या सेंटरवर काढा वाटपाचे काम केले. तर काढा वाटप समारोप प्रसंगी पाटण नगरपंचायतीचे अध्यक्ष संजय चव्हाण, उपनगराध्यक्ष सचिन कुंभार, मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांना काढा चूर्ण देऊन समारोप करण्यात आला. आयुष्य काढा वाटपासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य डॉक्टर मिहिर वाचासुंदर, जिल्हा प्रचारक सुजित घमंड, प्रसाद ठाकुर यांचे याप्रसंगी मार्गदर्शन लाभले. संदीप कुलकर्णी, दादासो मानकर, गणेश माळी, निरंजन जगताप, वैभव डुबल, गोपीनाथ कुलकर्णी, अजय किरपेकर, शंकरराव मोहिते, किशोर प्रभाळे,
विजय पाठक आदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक यांचा या उपक्रमात सहभाग होता.