Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीग्रामपंचायत परवानगी शिवाय माती उत्तखणनाचा परवाना देण्यात येवू नये ; ...

ग्रामपंचायत परवानगी शिवाय माती उत्तखणनाचा परवाना देण्यात येवू नये ; दै. ग्रामोध्दार च्या बातमीवर त्रिपूडी ग्रामपंचायतीचा तात्काळ निर्णय..

पाटण:- त्रिपूडी ता. पाटण गावाजवळ कोयना नदीच्या पात्रात होत असलेल्या हाजारो ब्रास माती उत्तखणनाने गावालगत असणारा नदी काठ गावातील प्राथमिक शाळा, काही घरांच्या जवळ आला असून याचा धोका दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीने कोयना नदीला येणाऱ्या महापूराने त्रिपूडी गावाला होणार असल्याची शक्यता निर्माण झाली असून त्रिपूडी ग्रामपंचायतीने यावर तातडीची बैठक घेऊन माती उत्तखणनासाठी ग्रामपंचायत परवानगी घेतल्याशिवाय संबधितांना माती उत्तखणनचा परवाना देण्यात येवू नये असा ठराव ग्रामपंचायतीने सर्वांनुमते संमत केला आहे. यावेळी त्रिपूडी ग्रामपंचायत गौण खनिज उत्तखणन आराखडा कृति समिती नेमण्यात आली. येथून पुढे ग्रामपंचायत गौण खनिज उत्तखणन आराखडा कृति समितीची परवानगी असल्याशिवाय त्रिपूडी ग्रामपंचायत हद्दीत माती उत्तखणन करता येणार नाही. असे सरपंच सौ. नंदा पाटील, उपसरपंच राहुल देसाई यांनी सांगितले.

या बैठकीला ग्रामपंचायत गौण खनिज उत्तखणन आराखडा कृति समिती सदस्य निलेश विरकर, सुमन विरकर, वैशाली जाधव, अनिता देसाई, शंकर चव्हाण, पोलीस पाटील वर्षाराणी देसाई, तुकाराम देसाई, संपत देसाई, तलाठी वी.व्ही गायकवाड यांची उपस्थिती होती.

या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची काटेकोर पणे अमलबजावणी केली जाणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे समितीच्या सर्व सदस्यांनी सांगितले. या समिती मार्फत गौण खनिज परवाना देणे पूर्वी ग्रामपंचायत चा नाहरकत दाखला घेणे बंधन कारक आहे. त्रिपूडी येथील कोयना नदीपात्रात लगत वस्ती असून गावाजवळ कोणीही विनापरवाना गौण खनिज माती मुरूम दगड काढल्यास वाहतूक करण्यास पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे. गावाजवळ उत्खनन होत असल्याने पावसाळ्यात अति पर्जन्यमान होऊन कोयना नदीला येणाऱ्या जादा पाण्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरते व अनेक कुटुंबाचे नुकसान होते. नदीकाठावरील कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलवावे लागते. अशी अवस्था असताना असेच माती उत्तखणन होत राहिल्यास आणखी किमान ५० ते ६० घरांना पुराच्या पाण्याची बाधा होऊ शकते. या सर्व बाबींचे गांभीर्य लक्षात घेऊन चालू असलेले उत्तखणन तात्काळ थांबवावे असा निर्णय या समितीने घेतला असून गावाच्या हद्दीमध्ये होत असलेल्या अधिकृत व अनधिकृत उत्खननाचे सर्व वाळू, माती, मुरुम, व दगड या गावच्या साधनसंपत्तीवर येथून पुढे त्रिपूडी ग्रामपंचायत गौण खनिज उत्तखणन आराखडा कृति समितीचे नियंत्रण राहील असे उपसरपंच राहुल देसाई यांनी सांगितले.

दै. ग्रामोध्दार च्या बातमीवर त्रिपूडी ग्रामपंचायतीचा तात्काळ निर्णय..
कोयना काठावर बेसुमार मातीचे उत्तखणन.. कोयना काठ धोक्यात.. या माथळ्याखाली दै. ग्रामोध्दार मध्ये आवाज उठविण्यात आला होता. या बातमीची दखल घेऊन जादा माती उत्तखणन व वाहतूक करणाऱ्यांवर महसूल विभागाने कारवाई चा बडगा उगारला. आता त्रिपूडी ग्रामपंचायतीने माती उत्तखणन करणाऱ्यांच्यावर कठोर निर्णय घेऊन त्रिपूडी ग्रामपंचायत गौण खनिज उत्तखणन आराखडा कृति समितीची तात्काळ स्थापना करून माती, वाळु, मुरुम, दगड उत्तखणन करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular