Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीग्रामीण भागातील जनता विसरलीय भान , त्यामुळे कोरोनाचे वाढलेय प्रमाण...

ग्रामीण भागातील जनता विसरलीय भान , त्यामुळे कोरोनाचे वाढलेय प्रमाण…

मेढा (वार्ताहर): सध्या सातारा जिल्हा कोरोनाच्या बाबतीत चर्चेचा विषय बनला असून, सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे,
सातारा जिल्ह्याची परिस्थिती ही कोरोनाच्या बाबतीत चिंताजनक बनली आहे. प्रशासकीय सूचनांनुसार महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त, चेक नाके देखील सुरू आहेत, मात्र हे चेक नाकेे फक्त शहरांच्या व तालुक्यांच्या महत्त्वाच्या ठिकाणीच आहेत. तर दुसरीकडे ग्रामीण भागात प्रशासनाचे दुर्लक्ष होत असताना दिसत आहे. सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, याचे कारण म्हणजे ग्रामीण भागात नागरिकांना जबाबदारीचे भानच राहिले नाही कोणतीही खबरदारी न घेता लोक फिरताना दिसत आहेत.
दुसरीकडे गावागावांमध्ये राजकीय मतभेद असणारे नेते, कार्यकर्ते आहेत. आपल्या राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांच्या जीवावर गावांमध्ये विना मास्क फिरताना, तसेच गावातील लोक जुगाराच्या अड्ड्यावर बसताना दिसत आहेत त्याचबरोबर छुप्या मार्गाने दुकाने देखील उघडी केली जात आहेत. या सर्व गोष्टीची विचारपुस गावातील नेमणुक केलेल्या प्रशासकीय कर्मच्यार्यानी केली तर त्यांना नोकरीवर गदा आनू अशी धमकी देत आहेत.एकमेकांचा वर्चस्व पणा दाखवण्यासाठी आपल्या वाडी वस्त्यांमधील लोकांना फूस लावून, “आम्ही आहोत ” “ते काय करतायेत ? असे शाब्दिक बळ देऊन त्यांना विनामास्क फिरण्याचे आव्हानच करत आहेत, आणि यासाठी ते प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखिल हाताशी घेऊन एखाद्यावर दमदाटी करण्याचा प्रयत्न देखील करत आहेत. याचेच अवसान घेऊन ग्रामीण भागातील बेफिकीर जनता विनामास्क, सोशल डिस्टंसिंग न पाळता, खुलेआम वावरताना दिसत आहे,आणि याचा परिणाम गावच्या आरोग्यावर होत आहे.अशी चर्चा गावागावात होऊ लागली आहे.
परिणामी ग्रामीण भागाबरोबर सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. सातारा जिल्हा कोरोना मुक्त करायचा असेल तर सर्व नागरिकांनी राजकिय मतभेद, गटतट विसरून शासनाच्या नियमांचे पालन करुन स्वता:चे गाव व सातारा जिल्हा कोरोना मुक्त करण्यासाठी एकजुटीने लढले पाहीजे. जे कोणी नियमांचे उल्लंघन करतील त्यांचे वर जिल्हाधिकारी सो व प्रशासनाने स्वतः लक्ष घालून योग्य भूमिका घेवुन कारवाई करावी अशी मागणी सूज्ञ व जागरूक नागरिकांकडून होतेय.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular