पाटण – पाटण तालुक्यातील तारळे विभागात कळंबे गावच्या शिवारात रात्रीच्या वेळी स्वतःच्या शेतात राखण करीत असताना नुकसानीसाठी घुसलेल्या डुकरांच्या कळपावर बंदुकीतून गोळी झाडली यात एका डुक्कराचा मृत्यू झाल्या प्रकरणी शेतकरी तुकाराम जाधव यांना वनविभागाने केले अटक.
. या बाबत वन विभागाकडुन मिळालेली माहीती अशी की पाटण तालुक्यातील तारळे विभागात दुर्गम भागात वसलेल्या कळंबे येथील तुकाराम ज्ञानदेव जाधव रा कळंबे याच्या पुर्व भागाकडील असणार्या शिवारात शुक्रवार दी २३ डीसेंबर रात्री राखण करीत होते. यावेळी रात्री १२ चे सुमारास २० ते २५ रान डुकरांचा कळप त्यांच्या शेतात घुसला होता. या डुक्करांच्या कडून शेतपिकाचे मोठे नुकसान होत होते. वर्षभराचे केलेले कष्ट डोळ्यादेखत वाया जात असल्याचे पाहून शेतकरी तुकाराम जाधव यांनी डुकराना शेतातून हाकलन्यासाठी डुक्करांच्या कळपाच्या दिशेने आपल्या कडील शेताच्या राखणी साठी परवाना असलेल्या ३१२ बोर बंदुंकीने बार केला या वेळी एका डुक्कराला गोळी लागल्याने ते जागीच ठार झाले सदर घटणेची माहीती वन.विभागाला समजताच पाटणचे.वनक्षेत्रपाल व्ही आर काळे व एच आर कुंभार आर जी कदम वन.मजुर संजय शिदें यशवंत बनसोडे तातडीने घटना स्थळी जावुन तुकाराम जाधव.यांना ताब्यात घेतले व त्यांच्यावर भारतीय वन्यजीव सरंक्षण कायदा १९ ५२ कलम ९/ ५१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधीक तपास वनक्षेत्रपाल व्ही आर काळे करीत आहेत.
या घटनेने शेती पिकवायची ती वन्य प्राण्यांसाठीच का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असुन स्वतः च्या शेतीचे स्वरक्षण करण्याचा अधिकार हि शेतकऱ्यांना ठेवला नाही. मग शेतकऱ्यांनी खायच काय? आणि बायका पोरांसह जगायच कस. या मानसिकतेत शेतकरी सापडला असून ” वन्य प्राणी जगवा माणसं मारा..” अशा संतप्त भावना शेतकऱ्यांच्या उमटू लागल्या आहेत.