सातारा, दि. 27 (जिमाका) : ग्रामीण भागातील महिला सबलीकरणासाठी महिला बचत गटांची संकल्पना पुढे आली आहे. महिला बचत गटांतील महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम होण्यासाठी बाजारपेठत कोणत्या वस्तुंची मागणी आहे त्यानुसार माल तयार करावा तुमच्या बचत गटांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वती मदत केली जाईल, असे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष संजीव नाईक निंबाळकर यांनी आज दिले.
महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नोती अभियानांतर्गत आयोजित मानिनी जत्रा 2017 चा समारोप व राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार 2017-18 चे वितरण आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. नाईक-निंबाळकर बोलत होते. या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, जिल्हा पषिदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे अंचल प्रबंधक हरिश्चंद्र माझीरे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर, नाबार्डचे सुबोध अभ्यंकर, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नितीन थाडे, समाज कल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, सुवर्णा पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
बचत गटांनी आता लोणचे-पापड उद्योगाच्या पुढे पाहिले पाहिज. मार्केटच्या मागणीनुसार आपला माल उत्पादीत करुन त्याचा एक ब्रॅन्ड तयार करुन मालाचा जर्दा चांगला ठेवून त्यात सातत्य कायम ठेवावे. सध्या मार्केटमध्ये हाताने केलेल्या वस्तुंची मागणी मोठ्या प्रमाणात आहे, याकडेही महिला बचत गटांनी लक्ष दिले पाहिजे. ग्रामीण भागातील महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजे ही शासनाची भूमिका आहे त्यामुळे महिला बचत गटांनी चांगले काम करावे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वती मदत केली जाईल, असेही जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.
महिला बचत गटांना सक्षम होण्यासाठी मार्केटच्या मागणीनुसार माल तयार केल्यास त्यांना आर्थिक उत्पन्न हमखास मिळेल. यासाठी बँकांनी महिला बचत गटांना उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शन करुन सहकार्य करावे. कच्चा माल सहज उपलब्ध होईल असा माल महिला बचत गटांनी तयार करावा. यावेळी मानिनी जत्रेमध्ये 32 लाख 43 हजारांची उलाढाल झाली आहे. गेल्या चार दिवसात 40 हजार लोकांनी या मानिनी जत्रेस भेट दिली आहे. ज्या मुलांचे 10 वी किंवा 12 वी शिक्षण झाले आहे अशा मुलांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत पंडित दिनदयाळ उपाध्यय ग्रामीण कौशल्य योजनेच्या माध्यमातून सुरक्षा रक्षक या पदासाठी प्रशिक्षण देण्यात येत असून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलाना स्थानिकरित्या रोजगारही उपलब्ध करुन दिला जाणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचलक श्री. थाडे यांनी केले. या कार्यक्रमास महिला, नागरिक तसेच जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला बचत गटांनी बाजारपेठच्या मागणीनुसार माल तयार करावा – संजीव नाईक-निंबाळकर
RELATED ARTICLES