सातारा : (विं. दा करंदीकर नगरी) : आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात जग जवळ येत असताना माणूस मात्र विस्थापित होतं चालला आहे. व्यापक समाजभानं देण्याऐवजी कोवळ्या मुलांच्या हातात दगड देण्याची प्रवृत्ती वाढत आहे. अशा परिस्थितीत सातार्याचा ग्रंथ महोत्सव मुलांच्या हातात पुस्तके देत आहे. नवा माणूस घडवण्याची प्रक्रिया ग्रंथच करू शकतात असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार विजय कुवळेकर यांनी केले.
19 व्या सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवाचे येथील विं. दा. करंदीकर नगरीत शानदार उद्घाटन झाले. कुवळेकरांनी आपल्या औघवत्या शैलीत माणसाला माणसाने जोडण्याची प्रक्रिया स्पष्ट केली आणि ग्रंथ महोत्सव आता वयात आला आहे तेव्हा काळजी घ्या असा कळकळीचा सल्ला संयोजकांना दिला. व्यासपीठावर संयोजन समितीचे अध्यक्ष शंकर सारडा, कार्यवाह. डॉ यशवंत पाटणे, शिक्षण संचालक दिनकर पाटील सहकार्यवाह शिरिष चिटणीस, प्रदीप कांबळे, साहेबराव होळ, सुनीता कदम प्रमोदिनी मंडपे उपस्थित होते.
कुवळेकर पुढे म्हणाले, साहित्य संमेलनात साहित्य वेगळं असतं मात्र सातार्याच्या ग्रंथ महोत्सवात आंतरिक उर्मी आहे. ग्रंथप्रेम व्यासंग यामुळे ग्रंथ महोत्सव यशस्वी झाला असून ग्रंथ निष्ठा हा खरा वाचकांचा उर्जा स्त्रोत आहे. शिक्षक व पालकांनी सातत्याने वाचले पाहिजे कारण समाजभानं हे संवेदनाहीन बनतं चालले असून बघ्यांची संख्या वाढली आहे. मूठभरं लोकांच्या स्वार्थासाठी कोवळ्या वयातं मुलांच्या हातात दगड दिले जात आहेत. माणूस माणसाला जोडला जाऊन समाजमनं प्रवाहित राहण्यासाठी ग्रंथसंस्कार आवश्यक आहे. माणसातील मनं घडवण्याचे काम ग्रंथच करतात. पुस्तक डोळसपणाने वाचले पाहिजे वाचनाला विचारांची जोड दिली गेली पाहिजे. नुसत्या शासकीय अनुदानाने महोत्सव होत नाही त्यासाठी आत्मिक बळं आवश्यक असते. माणसांची संवेदनशील ता टिकवण्याचे काम ग्रंथ व्यासंग करतात. जगात दुःखाच्या पलीकडे बरचं काही आहे त्यासाठी माध्यमांनी तिथपर्यंत पोहचण्याचं आवाहन कुवळेकर यांनी केले. मनं घडविणं आजची महत्वाची गरज आहे . माणसाचे मूल्यमापन अंर्तमनावरून झाले पाहिजे आणि संस्कारित मनांसाठी ग्रंथालये समृद्ध असली पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यकत केली. दिनकर पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ग्रंथ महोत्सव समितीने नवसृजनाचे प्रयोग सातत्याने सुरू ठेवण्याचा सल्ला दिला. कार्यक्रम सोहळ्याची सुरवात दीपप्रज्वलन व इशस्तवनाने झाली. शिरिष चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. सुनीता कदम यांनी सूत्रसंचालन केले.
परप्रांतियासाठी आता मराठीचे वर्ग
ग्रंथ महोत्सवाने आपल्या 18 वर्षाच्या कारकिर्दीत आता नवा अध्याय जोडण्याची तयारी केली आहे. सातार्यात व्यवसाय अथवा नोकरीसाठी येणार्या परप्रांतिय लोकांसाठी मराठी वर्ग घेण्याची घोषणा करण्यात आली. हा वर्ग येत्या मार्च महिन्यापासून सुरू होत असून त्याची जवाबदारी संयोजन समितीचे उपाध्यक्ष वि .ना. लांडगे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
शंकर सारडा बनले भावूक
जिल्हा ग्रंथ महोत्सवाच्या संयोजनात अध्यक्ष या नात्याने गेल्या 18 वर्षात शंकर सारडा यांनी जवाबदार पालकत्वाची भूमिका बजावली आहे. प्रकृती अस्वास्थामुळे सारडा यांचा गेल्या काही वर्षातील सहभाग कमी झाला असून सातत्याने सातारा वारी आता त्यांना शक्य होत नाही. ही खदखद आपल्या मनोगतातून व्यकत करताना शंकर सारडा यांचा आवाज कातरं बनला होता. मी संयोजन समितीकडे राजीनामा देऊनही तो घेतला जात नाही. कमिटी मला सोडतच नाही मात्र सर्व सदस्य कोणताही मानपानाची अपेक्षा न करता निरपेक्ष काम करतात असे कौतुक सारडा यांनी केले.