साताराः आ. शंभूराज देसाई तुमचे कर्तृत्व उभ्या महाराष्ट्राला चांगलेच माहीत आहे.विधिमंडळ परिसरातील आपले प्रकार जनता कधीच विसरणार नाही.आणि एक महिलेला पुढे करून बोगस जातपडताळणी प्रमाणपत्र मिळवून त्या महिलेला पोलिस स्टेशन व कोर्टाच्या पायर्या झिजवायला लावण्याचे कर्तृत्व कुणाचे. तुमच्याच बगलबाच्यानी मल्हारपेठ येथे बोगस मतदार नोंदणी करण्याचा पराक्रम केल्याचे रोजच पेपर मध्ये येत आहे. तर बिगर ऊस उत्पादक सभासद करून साखर कारखाना निवडणुकीत मताधिक्य मिळवणार्या तुमच्या कर्तृत्वाचा तालुक्यातील जनता अथवा शेतकरी, सभासद, कामगारांना फायदा झाला की त्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले? हे जगजाहीर आहेच. मात्र चोराच्या उलट्या बोंबा हेच तुमचे ध्येयधोरण आहे. हिम्मत असेल आणि खरोखरच तुमच्यात धमक असेल तर मग घोषणा केलेले प्रकल्प, युवकांना रोजगार व व्यवसाय निर्मिती आणि शेतकर्यांच्या ऊस दरावर बोला असा खणखणीत प्रतिहल्ला पाटण तालुक्याचे युवानेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी पाटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केला.
यावेळी बोलताना सत्यजितसिंह पाटणकर पुढे म्हणाले,शंभूराज देसाई यांना केवळ आमच्या वर खोटे आरोप करणे एवढा एकमेव उद्योग आहे. आमच्या वर निवडणुकीत बोगस मतदान मिळवल्याचा आरोप करणार्या देसाई यांचे आजवरचे बोगस पराक्रम जगजाहीर आहेत. पंचायत समिती सभापती इतर मागासवर्गीय महिला आरक्षण होते त्यावेळी तुमच्याकडे संबंधित आरक्षित उमेदवार नव्हता. त्यावेळी सौ सुमन जाधव या गरीब महिलेला पुढे करून त्यांचे नावे जातपडताळणी खोटे प्रमाण पत्र मिळवून त्या प्रमाणपत्राचा सभापती निवडीत गैर वापर केला हे प्रकरण उघडकीस आलेनंतर त्या महिलेला अजूनही त्या खटल्याकामी कोर्टात हेलपट्या मारावे लागत आहेत. मध्यंतरी तुमच्याच काही जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी मल्हारपेठ या गावांमध्ये बोगस मतदार नोंदणी केल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगकडे व संबंधित यंत्रणेकडे आहेत. याबाबत वृत्तपत्रातून बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मग आमदार देसाई तुम्हीच सांगा बोगस मतांवर कोण निवडून येतंय. यावरून शंभूराज देसाई तुमच्या वर्तमानपत्रामधून येणार्या विकासाच्या आकडेवारीवर जनतेनं भरोसा ठेवायचा का ? तुम्ही वर्तमानपत्रातून विकास कामासाठी घोषित करीत असलेली आकडेवारी बोगस कशावरून नाही? गेली अनेक वर्षे साखर कारखाना निवडणुकीत आपण अनेक प्रकल्पांच्या घोषणा केल्या त्या कारखान्याच्या धुरांड्यातील धुरासारख्या हवेत विरून गेल्या की काय ? घोषणा केलेल्या प्रकल्पांचे पुढे काय झाले ? हेच का तुमचं कर्तृत्व म्हणायचे ?. कारखाना निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणावर बिगर ऊस उत्पादक सभासद करून व त्यांच्या जीवावर मताधिक्य मिळवणं हेच तुमचे कर्तृत्व? या बिगर ऊस उत्पादकाना साखर कारखान्यांशी अथवा ऊस दराशी कोणताही संबंध नसतो म्हणूनच तुमचे विजयाचे मनसुबे यशस्वी होतात. जे प्रामाणिक शेतकरी सभासद तुम्हाला ऊस घालतात वर्षाला त्यांचे कोटयावधी रुपयांचे वाटोळे करायचे हेच तुमचे कर्तृत्व. जर तुमच्यात खरोखरच धमक असेल तर इतर कारखान्यांच्या तुलनेत नक्कीच चांगला दर तुम्ही ऊस उत्पादक शेतकर्यांना दयाल.मात्र तसे घडत नाही. हेच तुमच्या कर्तृत्वावरून सिद्ध होते. अगदी आपल्या साखर कारखान्याच्या वर्षानुवर्षे चा अहवाल पहिला असता कारखान्याची प्रगती चालली आहे की अधोगती चालली आहे याची साक्ष देत आहेत.
आ. देसाई हिम्मत असेल तर आयता मिळालेला साखर कारखाना वगळता तुम्ही तालुक्यातील जनतेसाठी कोणत्या नवीन प्रकल्पाची निर्मिती केली व त्यामधून किती युवकांना रोजगार व व्यवसाय मिळवून दिला हे सांगा आणि उभारलेल्या संस्थांमध्ये किती रोजगार व व्यवसाय निर्मिती झाली याची तुलना करा व आकडेवारी समजून घ्या.म्हणजे तुमचे कर्तृत्व काय हे तुम्हाला समजेल.
केवळ भाषणे किंवा वृत्तपत्रातून बातम्या देऊन आपले कर्तृत्व सिद्ध होत नाही किंवा वाढदिवसानिमित्त शेतकर्यांच्या पैशांवर एकवेळचे जेवण देऊन विकास होत नाही तर आम्ही जनतेला रोजची भाकरी कशी मिळेल यासाठी कायमच प्रयत्नशिल असतो .त्यामुळे तुमच्या बोगसगिरी ला येणार्या काळात या मतदारसंघातली सुज्ञ जनता तितक्याच ताकदीने उत्तर देईल आणि बोगस आमदार कोण हे जगजाहीर होईल असेही शेवटी सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले.
यावेळी बोलताना सत्यजितसिंह पाटणकर पुढे म्हणाले,शंभूराज देसाई यांना केवळ आमच्या वर खोटे आरोप करणे एवढा एकमेव उद्योग आहे. आमच्या वर निवडणुकीत बोगस मतदान मिळवल्याचा आरोप करणार्या देसाई यांचे आजवरचे बोगस पराक्रम जगजाहीर आहेत. पंचायत समिती सभापती इतर मागासवर्गीय महिला आरक्षण होते त्यावेळी तुमच्याकडे संबंधित आरक्षित उमेदवार नव्हता. त्यावेळी सौ सुमन जाधव या गरीब महिलेला पुढे करून त्यांचे नावे जातपडताळणी खोटे प्रमाण पत्र मिळवून त्या प्रमाणपत्राचा सभापती निवडीत गैर वापर केला हे प्रकरण उघडकीस आलेनंतर त्या महिलेला अजूनही त्या खटल्याकामी कोर्टात हेलपट्या मारावे लागत आहेत. मध्यंतरी तुमच्याच काही जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी मल्हारपेठ या गावांमध्ये बोगस मतदार नोंदणी केल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगकडे व संबंधित यंत्रणेकडे आहेत. याबाबत वृत्तपत्रातून बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मग आमदार देसाई तुम्हीच सांगा बोगस मतांवर कोण निवडून येतंय. यावरून शंभूराज देसाई तुमच्या वर्तमानपत्रामधून येणार्या विकासाच्या आकडेवारीवर जनतेनं भरोसा ठेवायचा का ? तुम्ही वर्तमानपत्रातून विकास कामासाठी घोषित करीत असलेली आकडेवारी बोगस कशावरून नाही? गेली अनेक वर्षे साखर कारखाना निवडणुकीत आपण अनेक प्रकल्पांच्या घोषणा केल्या त्या कारखान्याच्या धुरांड्यातील धुरासारख्या हवेत विरून गेल्या की काय ? घोषणा केलेल्या प्रकल्पांचे पुढे काय झाले ? हेच का तुमचं कर्तृत्व म्हणायचे ?. कारखाना निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणावर बिगर ऊस उत्पादक सभासद करून व त्यांच्या जीवावर मताधिक्य मिळवणं हेच तुमचे कर्तृत्व? या बिगर ऊस उत्पादकाना साखर कारखान्यांशी अथवा ऊस दराशी कोणताही संबंध नसतो म्हणूनच तुमचे विजयाचे मनसुबे यशस्वी होतात. जे प्रामाणिक शेतकरी सभासद तुम्हाला ऊस घालतात वर्षाला त्यांचे कोटयावधी रुपयांचे वाटोळे करायचे हेच तुमचे कर्तृत्व. जर तुमच्यात खरोखरच धमक असेल तर इतर कारखान्यांच्या तुलनेत नक्कीच चांगला दर तुम्ही ऊस उत्पादक शेतकर्यांना दयाल.मात्र तसे घडत नाही. हेच तुमच्या कर्तृत्वावरून सिद्ध होते. अगदी आपल्या साखर कारखान्याच्या वर्षानुवर्षे चा अहवाल पहिला असता कारखान्याची प्रगती चालली आहे की अधोगती चालली आहे याची साक्ष देत आहेत.
आ. देसाई हिम्मत असेल तर आयता मिळालेला साखर कारखाना वगळता तुम्ही तालुक्यातील जनतेसाठी कोणत्या नवीन प्रकल्पाची निर्मिती केली व त्यामधून किती युवकांना रोजगार व व्यवसाय मिळवून दिला हे सांगा आणि उभारलेल्या संस्थांमध्ये किती रोजगार व व्यवसाय निर्मिती झाली याची तुलना करा व आकडेवारी समजून घ्या.म्हणजे तुमचे कर्तृत्व काय हे तुम्हाला समजेल.
केवळ भाषणे किंवा वृत्तपत्रातून बातम्या देऊन आपले कर्तृत्व सिद्ध होत नाही किंवा वाढदिवसानिमित्त शेतकर्यांच्या पैशांवर एकवेळचे जेवण देऊन विकास होत नाही तर आम्ही जनतेला रोजची भाकरी कशी मिळेल यासाठी कायमच प्रयत्नशिल असतो .त्यामुळे तुमच्या बोगसगिरी ला येणार्या काळात या मतदारसंघातली सुज्ञ जनता तितक्याच ताकदीने उत्तर देईल आणि बोगस आमदार कोण हे जगजाहीर होईल असेही शेवटी सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले.