सातारा : सातारा तालुक्यातील आसनगाव येथील बंद पडलेली जुनी पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने या गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. बंद पडलेली जुनी योजना बंद करुन नवीन पाणीपुरवठा योजना सुरु करुन आसनगावा पाणीप्रश्न तातडीने सोडवावा, अशी सुचना आ. श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांना केली. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सुचनेनुसार डॉ. शिंदे यांनी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला 15 दिवसांत नवीन पाणीपुरवठा योजनेचे इस्टीमेट करण्याच्या सुचना केल्या. यामुळे आसनगावच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम लवकरच मार्गी लागणार आहे.
आसगावचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिंदे यांची भेट घेतली. यावेळी पंचायत समितीचे सभापती मिलींद कदम, सदस्य आषुतोष चव्हाण, माजी उपसभापती अरविंद चव्हाण, सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. विक्रम पवार, आसनगावचे सरपंच मनोज गायकवाड, उपसरपंच बबन गायकवाड, प्रभाकर गायकवाड, भरत पवार, रमेश गायकवाड, जोतिराम गायकवाड, लक्ष्मण पवार, वसंत पवार, किसन पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीस जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सप्रे आणि त्यांचे सहकारी अधिकारी व कर्मचारी हजर होते.
यावेळी आसनगावची पाणी समस्या यावर सविस्तर चर्चा झाली. आसनगाव येथे यापुर्वी असलेली पाणीपुरवठा योजना बंद पडली आहे. यामुळे ग्रामस्थांना पाणी असूनही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पुर्वीची पाणीपुरवठा योजना बंद करावी आणि जिल्हा परिषदेने नवीन पाणीपुरवठा योजना या गावासाठी मंजूर करावी. जेणेकरुन या गावाचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी संपुष्टात येईल. याबाबत आपण तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिंदे यांना केली. आसनगाव येथे नवीन पाणीपुरवठा योजना करण्यासाठी डॉ. शिंदे यांनी होकार दिला आणि पाणी पुरवठा विभागाने तातडीने नवीन पाणीपुरवठा योजनेचे इस्टीमेट करावे, अशी सुचना डॉ. शिंदे यांनी सप्रे यांना केली.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार येत्या 15 दिवसांत पाणीपुरवठा विभागाने नवीन योजनेसाठीचा अहवाल सादर करावा अशी सुचना डॉ. शिंदे यांनी संबंधीत अधिकार्यांना केली.
त्यामुळे येत्या 15 दिवसांत आसनगाव येथे नव्याने होणार्या पाणीपुरवठा योजनेचा अहवाल तयार होणार असून यानंतर तातडीने पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेण्यात येणार आहे.
नवीन पाणीपुरवठा योजना झाल्यास आसनगावकरांचा पाणीप्रश्न कायमचा निकाली निघणार असून सदर योजना मंजूर केल्याबद्दल उपस्थित ग्रामस्थांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे आभार मानले.