सातारा : सातारा जिल्हा ट्रान्सपोर्ट माल व प्रवासी वाहतुक असोसिशन तर्फे इंधन दरवाढ, इन्शुरन्समधील दरवाढ, टोक नाक्यावरील अनागोंदी कारभाराबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदवून निदर्शने करण्यात आली.
जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरात डिझेलच्या दरात जवळ जवळ दुप्पट प्रमाणात वाढ झाली आहे. वाढलेल्या दरामुळे वहातुकदारांना व्यवसाय करणे अवघड ालेले आहे. डिझेेलच्या दरावर केंद्र सरकार व राज्य सरकार यांचे असलेले भरमसाट कर हे त्वरील कमी करण्यात यावेत अन्यथा वहातुक व्यवसाय अगोदरच अडचणीत असलेला आहे व नाश होण्याची शक्यता आहे. तसेच इन्शुरन्सच्या दरात प्रत्येक वर्षी वाढ केल्यामुळे वहातुकदारांना तो भरणे अवघड झाले आहे. कंपन्या फायद्यात असताना सुध्दा ही दरवाढ कशासाठी?
आनेवाडी टोलनाका व तासवडे टोलनाका या ठिकाणी सरकार बरोबर झालेल्या करारा प्रमाणे कोणत्याही गोष्टीची पुर्तता संबंधिताकडून केली जात नाही या उलट त्रास देवून ज्यादा पैसेेंचे मागणी केली जाते.
टोल नाक्यांवर क्रेन अॅम्बुलन्स उपलब्ध नसतात अपघातानंतर कोणतीही मदत तातडीने मिळत नाही वजन काट्याचा दुरुपयोग केला जात आहे.
या मोर्चा आंदोलनात अध्यक्ष प्रकाश गवळी, सचिव धनंजय कुलकर्णी, उपाध्यक्ष गुरुप्रसाद सारडा, पांडूरंग राउत व ट्रान्सपोर्ट माल वाहतुकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.