पुसेगाव ( विशाल सूर्यवंशी) : महीला ही अबला नसून सबला आहे. महीलांनी त्यांच्या हक्काची जाणिव या संदर्भात जागृत राहून अन्यायाविरूध्द आवाज उठवण्यासाठी सज्ज झाले पाहीले त्यांच्या पाठीशी भूमाता ब्रिगेड खंबीरपणे उभी राहत आहे.आजवर अनेक दबलेल्या, दुर्लक्ष महीलांच्या अन्यायाला वाचा फोडली आहे. तक्रारदारांची नावे गोपनीय ठेऊन गनिमी कावा नितीचा वापर करून संबंधीतांना अनेकदा न्याय मिळऊन देण्यात भूमाता ब्रिगेड अग्रणी राहीली इहे.अअजून अनेक प्रश्न तडीला लावायचे आहेत यासाठी महीलांनी रणरागिनी तृप्ती देसाई यांच्या पाठीशी उभे राहणे गरजे आहे. भूमाता ब्रिगेड समाजातील तळागाळातील नागरिकांच्या हक्कासाठी निरपेक्ष भावणेने काम करत आहे असे मत भूमाता ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजकुमार ठोंबे यांनी व्यक्त केले पुसेगावमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषेद मध्ये ते बोलत होते
यावेळी त्यांच्याबरोबर जिल्हा अध्यक्षा माधुरी टाणपे,वनिता भंडारे,मंगल साबळे,सविता राऊत,अलका माने,शालिनीताई वाघमारे यांच्यासह महीला कार्यकर्त्या उपस्थित होत्या
अंगणावाडी सेविका आणि मदतनीस यांच्या अडचणी संदर्भात एकात्मिक बाल विकास सेवा योजना, सातारा यांच्याकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून दिला याची माहीती देण्यासाठी पत्रकार परीषद आयोजित करण्यात आली होती.
यावेळी राजकुमार ठोंबे म्हणाले महीलांच्या गैरसोयीचा फायदा घेणे चुकिचे आहे. अनेकदा नोकरी करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दुय्यम आणि अन्यायकारक वागणूक मिळत असते पण रोजगाराचा प्रश्न असल्याने अनेकदा निमुटपणे असे अन्याय सहन केला जातो. यामुळे दुष्ट प्रवृत्तींचे साहस वाढते. त्यामुळे महीलांनी धाडस करून समोर येणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा दुष्ट प्रवृत्ती लागलीच टेचल्या जातील. अन्याय सहन करणे हे गुलिमगिरीचे लक्षण आहे. यसाठी भूमाता ब्रिगेडच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत असल्याचेही राजकुमार डोंबे यांनी सांगितले.