मायणी :(सतीश डोंगरे) खटाव माण या कायम दुष्काळी तालुक्याला आश्वासन आणि भुलवण्यातच आघाडी सरकारने आजवरचा कालावधी घालवला आहे .आजवर जिहे कटापूर,उरमोडी,तारळी ,टेंभु या योजनेच्या पूर्णत्वासाठी मी आजवर माझे आयुष्य खर्ची घातले असून या कामात विरोधकांनी या ना त्या कारणांनी खोडा घालायचे पाप केले आहे परंतु खटाव माण या दुष्काळी तालुक्यात या सर्व योजनांचे पाणी आणल्याशिवाय मी अंतिम श्वास घेणार नाही , असा निर्धार माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर यांनी व्यक्त बोलून दाखवला ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्यसत्कार समारंभ कार्यक्रमात बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर ,मायणीच्या सरपंच सचिनभाऊ गुदगे,उपसरपंच सुरज पाटील, वडूज बाजार कमिटीचे माजी सभापती सोमनाथ माळी,ग्रां प सदस्य आनंदा शेवाळे,जगन्नाथ भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यानिमित्ताने सकाळी नऊ वाजता लक्ष्मीनगर ते घाडगेवस्ती या रस्त्याचे मुरुमीकरण,नदाफ कॉलनी तील गटारांची कामे,चितळीरोड ते यलमरवस्ती चे मुरुमीकरण, या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी पुढे बोलतांना डॉ येळगावकर म्हणाले, विरोधक कितीही विरोध करीत असले तरी टेंभू चे पाणी मायणी तलावात लवकरचं येणार आहे.ही योजना यशस्वी करण्याच्या पाठीमागे राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा फार मोठा हात असून खऱ्या अर्थाने या भागातील पाणी प्रश्न मिटवण्यासाठी त्यांनी सहकार्य केले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर म्हणाले , डॉ येळगावकर यांच्या सारखा कणखर आणि भक्कम नेता आजवर मी पाहिलं नाही ,संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी व काँग्रेस चा विरोध मोडून काडून भाजप पक्षाला या भागात भक्कम बनवण्याचे काम डॉ दिलीपराव येळगावकर यांनी केले आहे .
यावेळी सरपंच सचिन गुदगे, उपसरपंच सुरज दादा पाटील,मोहन दगडे यांचीही मनोगते झाली. या कार्यक्रमास शिवाजीआण्णा पाटील, विजयकुमार कवडे,राहुल जाधव,प्रतिनिधी अभिजित माळी,दत्तात्रेय काबुगडे,दस्तगीर इनामदार,शामराव मासाळ,अनिल पाटोळे,जालिंदर माळी, राजाराम कचरे,महादेव यलमर, मधुकर कचरे,जनार्दन देशमुख,समीर नदाफ,गणीभाई बागवान,मकरंद तोरो,शैलेश लुकडे,गणेश देशमुख,राहुल लोखंडे आदी प्रमुख कार्यकर्ते ही उपस्थित होते.
राजाराम कचरे यांनी सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार मानले.
खटाव माण तालुक्यात सर्व योजनांचे पाणी आणल्या शिवाय अंतिम श्वास घेणार नाही :- डॉ दिलीप येळगावकर
RELATED ARTICLES