मायणी :-(सतीश डोंगरे) : निसर्गाचे चक्र सदैव चालू राहण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ,मानवाने निसर्गातवर हुकूमत गाजवण्याचा केलेला प्रयत्न यामुळे वाढलेले ग्लोबल वोर्मिंग त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास तर होतोच आहे परंतु पृथ्वीतलावर प्रत्येक जीवाला त्याचा फटका बसत आहे ,या सर्वांच्यावर आळा घालण्यासाठी वृक्षलागवड करणे ही काळाची गरज बनली आहे ,असे मत वडूज वन परिक्षेत्र अधिकारी गजानन चव्हाण यांनी व्यक्त केले.ते मायणी पक्षी अभयारण्य येथे साजरा करण्यात येणाऱ्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात बोलत होते.यावेळी वनपरिमंडल अधिकारी मोहन शिंदे,नियतक्षेत्र अधिकारी दादासाहेब लोखंडे,दादा जानकर, मायणी पत्रकार संघ सचिव दत्ता कोळी ,पत्रकार सतीश डोंगरे ,महेश जाधव,तानाजी चव्हाण,गणेश पाटील,भूमाता ब्रिगेड चे खटाव तालुकाध्यक्ष अमोल भिसे शैलेश भिसे,वन कर्मचारी अंकुश पवार ,मोहन जाधव,दुर्योधन जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मायणी वनक्षेत्रचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करताना श्री चव्हाण पुढे म्हणाले, मायणी येथील रोपवाटिका अत्यंत उत्तमरीत्या जोपासली जात असून सध्याची रोपांची संख्या लाखाच्या वरती जाऊन पोहचली आहे. याचा उपयोग खटाव तालुक्यातील वृक्ष लागवडीस होऊन या भागातील पर्यावरणाच्या संतुलित राहण्यास मदत होणार आहे. वृक्ष लागवडीमुळे फक्त पर्यावरणाचं संतुलित राहणार नसून त्यामुळे पर्जन्यमानात वाढ,प्राणी व पक्षाना आसरा मिळणार आहे.यामुळे जास्तीत जास्त लोकांनी वृक्षलागवडीत सहभागी होऊन आपला भाग निसर्गारम्य बनवण्यात मदत करावी.
यावेळी उपस्थितांचे आभार वनपरिमंडल अधिकारी मोहन शिंदे यांनी मानले.