Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीकेएसडी शानभाग विद्यालयात एनडीए ट्रेनिंग सेंटरचा शुभारंभ

केएसडी शानभाग विद्यालयात एनडीए ट्रेनिंग सेंटरचा शुभारंभ

साताराः येथील केएसडी शानभाग विद्यालय व कनिष्क महाविद्यालयात नुकताच एनडीए मार्गदर्शन केंद्राचा उदघाटन सोहळा मोठया उत्साहात पार पडला. सातारा येथील सैनिक स्कूलचे प्राचार्य लेफटनंट कर्नल रणजितसिंह नलावडे यांचे हस्ते या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे विश्‍वस्त अ‍ॅड. विलास आंबेकर, सौ. अमिता आंबेकर, विद्यालयाच्या संचालिका सौ. आंचल घोरपडे, मुख्याध्यापिका सौ. रेखा गायकवाड, मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी, शाळेचे पालक प्रतिनिधी,शिक्षक, पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
उदघाटनप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. सौ. आंचल घोरपडे यांनी प्रमुख पाहुण्यांचे गुलाबाचे झाड देवून स्वागत केले व प्रास्तविक भाषणात संपूर्ण सातारा जिल्हयात एनडीएच्या युपीएससी व एसएसबी च्या तयारीसाठी हे पहिले मार्गदर्शन केंद्र असून या केंद्रातून अधिकाअधिक गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षार्थीना मान्यवर मार्गदर्शन करणार आहे असे सांगितले.
कर्नल रणजितसिंह नलावडे यांनी केंद्रास शुभेच्छा देताना सांगितले की, सर्वप्रथम महाराष्ट्र ही माझी मराठी भूमी ज्या मातीत छ. शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. सातारा ही शुरवीरांची आणि जवानांची भूमी म्हणून प्रसिध्द आहे. पण आता सातारा फक्त जवानांसाठी म्हणून न राहता तो अधिकार्‍यांची भूमी म्हणून ओळखला जावा. आतापर्यात सातार्‍यातील 28 हजार जवानांनी देशसेवा केली आहे परंतु त्यातील मोजकेच अधिकारी आहेत. याकरिता भावी विद्यार्थी व इच्छुकांना मार्गदर्शनासाठी हे केंद्र सुरू करण्यात आले ही गौरवपूर्ण बाब आहे.
या विद्यालयाचे संस्थापक रमेश शानभाग हे सैनिक स्कूलचे माजी विद्यार्थी होते आणि ते एनडीएसाठी पात्र झाले होते. सामाजिक भावनेतून समाजाला नवीन व उपयुक्त उपक्रमासाठी हे केंद्र मार्गदर्शन करेल. आपले ध्येय साध्य करणेसाठी 3 ते 4 वर्षे अपार कष्ट व मेहनत घ्यावी लागेल. एनडीएसाठी 11 लाख विद्यार्थी परीक्षेस बसतात त्यातून फक्त 380 जणांची निवड होते त्यासाठी कष्टाची तयारी ठेवा.
अ‍ॅड. विलास आंबेकर यांनी 1990 पासून विद्यालयाचा प्रगतीचा आलेख चढता ठेवला आहे याचे कौतूक वाटते. व हे केंद्र निश्‍चित प्रसिध्दी पावेल असे संागून शुभेच्छा दिल्या.
यावेळी विद्यालयाच्या प्ले ग्रुप ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यानी स्वातंत्र्यदिनानिमित्त आपली मते भाषणातून व्यक्त देशभक्तीपर गीते सादर केली. खाऊवाटप करून कार्यक्रमाची संागता झाली.

एनडी सेंटरच्या उदघाटनाला अनुसरून शनिवार दि.  18 ऑगस्ट रोजी दुपारी 4.30 ते 6 यावेळेत इच्छुक विद्यार्थी व पालकांसाठी विशेष चर्चासत्र आयेाजित केले असून यामध्ये ब्रिगेडीअर बोधे व लेफटनंट कर्नल रणजितसिंह नलावडे मार्गदर्शन करणार आहेत.

(छायाः अतुल देशपांडे)

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular