Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीधोम धरणातून पाच हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग ; काठावरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा ; वाईच्या...

धोम धरणातून पाच हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग ; काठावरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा ; वाईच्या कृष्णा माईचा पूर पाहण्यासाठी वाईकरांची तुडूंब गर्दी ; धरणातून पाण्याचा विसर्ग चालू राहिल्यास महागणपती मंदीरासह महागणपती पूल जाणार पाण्याखाली

वाई :  सातारा जिल्ह्यासह संपूर्ण वाई तालुक्यात समाधान कारक पाऊस पडल्याने तालुक्यातील सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत. बलकवडी धरण पूर्ण क्षमतेने 100% भरले असून बलकवडी धारणा पाठोपाठ धोम धरण सुध्दा 96.50% भरले आहे. त्यामुळे धोम धरणातून पाच हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याचे धोम पाटबंधारे खात्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे वाईच्या पश्चिम भागातील शेतकर्‍यांमध्ये समाधानाचेवातावरण आहे.पावसाने पुन्हा एकदा समाधानकारक सुरुवात केल्याने सध्यातरी पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याचे चित्र दिसत आहे.
वाईच्या  पश्चिम भागातील भात हे मुख्य पिक असून ते समाधानकारक व्यक्त करताना दिसत आहे. बलकवडी धरण हे 100% भरल्यानंतर बलकवडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग धोम धरणात करण्यात आल्याने पाण्याची पातळी झपाट्याने वाढून शुक्रवारी धोम धारण पूर्ण क्षमतेने भरल्याचे धोम पाटबंधारे विभागाच्या वितीने जाहीर करण्यात आले. आज धोम धरणाची पातळी 747मीटर असून 13.3 टीएमसी हे धरण आहे, सध्या धरणात 6394 क्युसेस पाण्याची आवक असून त्यातून 5668 क्युसेस पाण्याच विसर्ग चालू केला आहे. धरणाचे पाचही दरवाजे तीन फुटांपर्यंत उघडले आहेत. त्यामुळे कृष्णा नदीला महापूर आला असून पुराचे पाणी गणपती मंदिराला लागले आहे. कृष्णा नदीला आलेला महापूर पाहण्यासठी वाईकर नागरिकांनी चांगलीच गर्दी केली आहे.
धोम पाटबंधारे खात्याकडून काठावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच काठावरील ग्रामीण भाग या शहरातील नागरिकांनी नदी काठावर कपडे धुणे, पाण्यात उतरणे, मासेमारी करणे या सारख्या प्रकारापासून लांब राहण्याची विनंती करण्यात आली आहे. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असून पाऊस न थांबल्यास पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याचे हि संबधित विभागाने प्रसिध्द केले आहे. धोम धरण सुध्दा पूर्ण क्षमतेने भरले असून सध्या तरी पाण्याचे सर्व प्रश्न निकालात निघाले आहेत. धोम-बलकवडी धरणावर जवळ पास पाच तालुक्यांचे भवितव्य अवलंबून आहे. पावसाने ओढ दिल्याने या सर्व तालुक्यातील खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली होती. बागायती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली होती, ती परतीच्या पावसाने भरून काढली आहे. नागेवाडी धरणक्षेत्रात सुद्धा समाधान कारक पावसाची नोंद झाली आहे. तेही धरण भरण्याच्या मार्गावर आहे.
. (छायाचित्र : धनंजय घोडके)
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular