पाटण:- ( शंकर मोहिते ) – पाटण तालुक्यात मुसळधार पडणार्या पावसामुळे, व कोयना धरणातून वेळोवेळी सोडलेल्या पाण्यामुळे कोयना नदीपात्रा लगतच्या कराड चिपळूण मार्गावरील शिरळ गावातील बागवस्तीतील सर्व घरांसह जमिनिला भुस्खलनामुळे तडे गेल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेकडे वेळीच प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. नाहीतर सारख्या माळीन सारख्या घटनेची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही.
कराड चिपळून मार्गावर कोयना नदीपात्रातालगत बागवस्ती असून नदीच्या पाण्यामुळे व पावसामुळे येथील जमिन भुसभुशीत होऊन भुस्खलन झाले आहे, त्यामुळे येथील ग्रामस्थांच्या घरांच्या भिंतीला व जमिनीवर मोठमोठ्या भेगा पडून घराखालील जमिन १३ वर्षांपासून पावसाळ्यात हळुहळु पाठीमागील कोयना नदीपात्राच्या दरीच्या बाजूने सरकत असून या ठिकाणी माळीण सारखी परिस्थीती निर्माण झाली आहे, कोयना धरणातून दरवर्षी पावसाळ्यात सोडण्यात येणाऱे पाणी या घरांत कधी घुसेल याचा काही नेम नसल्याने व त्यातच नदीच्या पाण्यामुळे व सततच्या पावसामुळे जमिनीचा भाग खचत गेल्याने घरे नदीपात्राकडील बाजूने सरकू लागली आहेत त्यामुळे येथील सर्व नव्या जुन्या घरांच्या भिंतीना मोठमोठे तडे जाऊन काही भिंती कोसळल्या आहेत यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने येथील ग्रामस्थांना रात्र रात्र जागून काढावी लागत आहे.
या वस्तीच्या पर्यायी पुनर्वसनाच्या बाबतीत दरवर्षी येथील ग्रामस्थ शासनाकडे पाठपुरावा करत आहेत पण त्याबाबतीत काहीच निर्णय होत नसल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. तरी या ठिकाणी माळीण सारखी परिस्थिती होण्याची शक्यता आहे, शासनाने याचा गांभीर्याने विचार करून आमचे पर्यायी कायमचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
– गेल्या चाळीस वर्षात असा पाऊस पडला नाही घरापाठीमागील कोयना नदीचे पाणी कधी घरात शिरेल याचा नेम नाही तर नदीच्या व पावसाच्या पाण्यामुळे घराखालील जमिन भुसभुशीत झाल्याने घरे नदीकडील बाजूने सरकली आहेत वत्यामुळे आमच्या सर्वाच्या घरांना व जमिनींना भेगा पडून काही घरांच्या भिंत पडल्या आहेत. यामुळे आमच्या वर दुहेरी संकट आले आहे. आम्हाला पोरांबाळांना घेऊन रात्र रात्र जागून काढावी लागत आहे. -रशीद शेख-ग्रामस्थ.