साताराःसनातन संस्था,हिंदु जनजागृती संघटना व अन्य समविचारी हिंदुत्ववादी संघटना यांना खोटया प्रकरणांत गोवून बंदी आणण्याच्या षडयंत्राला विरोध करण्यासाठी विविध हिंदुत्ववादी संघटनेतर्फे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,सनातन संस्था आणि तिचे साधक गेली दोन दशकांहून अधिक काळ निस्पृहपणे हिंदु धर्म आणि संस्कृती यांचा प्रचार करून समाजाला अध्यात्म,साधना, संस्कृती आणि राष्ट्राविषयी जागृती करत आहेत. तसेच भ्रष्टाचार,जनतेची लुटालुट,अन्याय विरोधात वैधमार्गाने लढा देत आहे. त्यामुळे समाज नैतिकता आणि धर्माचरण यांकडे वळून सुखशांतीच्या आणि समृध्द जीवनाच्या मार्गाकडे जात आहे.नालासोपारा येथील गोरक्षक वैभव राऊत यांना 9 ऑगस्टला रात्री आतंकविरोधी पथकाच्या पोलीसांनी अटक करून त्यांच्या निवासस्थानी काही स्फोटके सापडल्याचे म्हटले आहे. वैभव राऊत यांच्यासह सुधन्वा गोंधळेकर, शरद कळसकर यांच्यासह आणखी काही जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले कुणीही सनातन संस्थेचे साधक नसताना सनातन संस्थेवर बंदी घाला अशी बिनबुडाची आणि उथळ मागणी काही राजकीय पक्ष, संघटना, मुस्लीम नेत्यांकडून केली जात आहे. काही माध्यमांकडून सनसनाटी आणि दिशाभूल करणार्या बातम्या प्रसारित करून हिंदु आंतकवादाचा ढोल बडवला जात आहे. असाच प्रकार सन 2008 मध्ये मालेगाव बॉम्बस्फोटाच्यावेळी घडला होता. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित, सुधाकर चतुर्वेदी यांच्यासह अनेक हिंदुत्वनिष्ठांना खोटया गुन्हयात अटक करून 9 वर्षे तुरूंगात अडकवण्यात आले. नंतर ठोस पुरावा नसल्याने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने स्पष्ट केल्यावर सर्वाना जामीन मिळाला. वैभव राऊत आणि अन्य हिंदुत्वनिष्ठांच्या संदर्भात हीच गोष्ट झाली असण्याची दाट शंका आहे.राऊत यांच्या पत्नीने घरात सुईसुध्दा सापडली नसल्याचा दावा केला आहे. नालासोपारा येथील 9 हजारांहून अधिक नागरिकांनी पोलीस कारवाईच्या विरोधात मोठे जनआक्रोश आंदोलन केले आहे. पंढरपूर येथील अवधूत पैठणकर,प्रसाद देशपांडे यांच्यावर खोटी साक्ष देण्यासाठी एटीएसच्या अधिकार्यांनी बेदम मारहाण केल्याचे उघड झाले आहे. यातून एक मोठे षडयंत्र चालू असल्याचा दाट संशय आहे.केवळ याच प्रकरणात डॉ. दाभोळकर, कॉ.पानसरे, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्यांच्या प्रकरणातही असाच प्रकार घडला आहे. मुळात ठाणे व मडगाव यापैकी कुठल्याही बॉम्बस्फोटातील आरोपपत्रात सनातन संस्थेचे नाव आलेले नाही. एफआयआर बनवून सनातन संस्थेला गोवण्यासाठी प्रयत्न झाला आहे. तत्कालीन कॉग्रेस शासनाने सन 2011 मध्ये सनानतवर बंदी घालण्यासाठी प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता मात्र पुराव्याअभावी बंदी घालता आली नाही.
दरम्यान,सकाळी 10.30 वा. समस्त हिंदुत्ववादी संघटनेर्फे आनंदवाडी दत्तमंदिर, सयाजीराव विदयालय, हॉटेल मोनार्कमार्गे शिवतीर्थ पोवईनाका, जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मोठया संस्थेचे विविध हिंदुत्ववादी संघटनंाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
समस्त हिंदुत्ववादी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
RELATED ARTICLES