म्हासुर्णे (प्रतिनिधी तुषार माने ) :खटाव तालुक्यातील म्हासुर्णे परिसरातील शेतकर्यांच्या ऊसाला हुमणी लागल्याने एकरच्या एकर ऊसाचे प्लॉट गेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस पिकाच्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे,
सध्या या परिसरात हुमणीने मोठ्या प्रमाणात उसाच्या पिकाचे नुकसान केले आहे त्यामुळे हजारो हेक्टर ऊसाचे उत्त्पन्न घटणार आहे आणि त्याचे परिणाम कारखानदार व शेतकऱ्यांवर होणार आहेत, तरी या हुमणी नियंत्रणासाठी कृषी विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज असून गावोगावी हुमणी नियंत्रणासाठी शेतकर्यांच्या बैठका घेणे गरजेचे आहे, फक्त तालुका व जिल्हाच्या ठिकाणी बैठका घेऊन हा प्रश्न सुटणार नाही, तरी कृषी विभागाने तातडीने या विषयाच्या अनुशंगाने चर्चासत्र आयोजित करणे गरजेचे आहे,
तरी या परिसरातील अठरा ते एकोणीस कांड्यावरती असणाऱ्या उसाला हुमणी लागल्याने अख्खे प्लॉट भुईसपाट झालेले आहेत, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे.
या परिसरातील आडसाली लागण व अडसाली खोडव्यांना मोठ्या प्रमाणात हुमणीचा प्रादुर्भाव झालेले दिसून येत आहे
त्यामुळे ऊस मोठा असल्यामुळे शेतकऱ्यांना औषधांची आळवणी घालता येत नसल्याने हुमणी अटोक्यात एेत नाही
आणि हुमणी शंभर टक्के आटोक्यात येण्यासाठी आवश्यक ते उपाय करूनसुद्धा हुमणी आटोक्यात येत नसल्याचे चित्र सध्या या परिसरात आहे .दुकानदार सांगेल ते औषध शेतकरी वापरत आहे परंतु हुमणी आटोक्यात येत नसल्याने उसाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.
म्हासुर्णे परिसरातील ऊस शेतकरी हुमणीच्या प्रादुर्भावाने अडचणीत
RELATED ARTICLES