पुसेसावळी: खटाव तालुक्यातील महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पुसेसावळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपा विचारांच्या साेै.मंगलताई ज्ञानदेव पवार यांची बिनविरोध निवड झाली ,
सन २०१५ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये श्रीकांत पाटील, राजू कदम, यांच्या संयुक्त प्रयत्नाने ग्रामपंचायतींमध्ये बदल होऊन साेै.भारती कांबळे यांची सरपंचपदी विराजमान झाल्या, त्यानंतरचे काळामध्ये श्री हनुमान ग्रामविकास पॅनेलच्या अंतर्गत समझोत्यानुसार भाजप युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या पत्नी सौ मंगलताई पवार यांची बिनविरोध निवड
झाली,
त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुसेसावळी ग्रामपंचायतीच्या राजकारणात बळ मिळणार आहे, तसेच भाजपच्या माध्यमातून पुसेसावळीसाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमधून २४बाय ७ पाणीपुरवठा योजनेसाठी तब्बल अडिच कोटींची तरतूद केली असून येत्या दोन महिन्यातच या कामाचे भूमीपूजन मंत्री महोदयांच्या उपस्थित होणार आहे,त्याचबरोबर या परिसरातील आवश्यक असलेली १०८ रुग्णवाहिका सेवा, अद्यावत व्यायामशाळा, मागासवर्गीय लोकांसाठी घरकुलांसाठी जमीन, अंतर्गत रस्ते, गटर्स,रिंगरोड ग्रामपंचायत प्रशासकीय इमारत इ. विकासकामासाठी भरीव निधींचे प्रस्ताव श्रीकांत पाटील व सर्व सदस्यांच्या माध्यमातून शासनाकडे सादर केले आहेत तरी त्यालाही लवकरच मंजुरी मिळणार आहे,
त्याचप्रमाणे पुसेसावळीची ग्रामीण पेयजल योजना आराखड्यात समाविष्ट करण्यासाठी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजीफडणवीस,ना.चंद्रकांत दादा पाटील, भिडे गुरुजी
ना.बबनरावजी लोणीकर, मा.आ.दिलीपरावजी येळगावकर भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रमबाबा पावसकर,यांच्या विशेष प्रयत्नातून झाली असून या योजनेची संकल्पना भाजपा युवा मोर्चाचे ज्ञानदेव पवार श्रीकांत पाटील नितीन वीर सर्व सदस्यांनी मंत्रालयापर्यंत पोहोचणेस अथक परिश्रम घेतले,
यावेळी नवनिर्वाचित सरपंच सौ मंगलताई पवार यांचा सत्कार महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील, मा.शिरीषची महाजन,मा.ना.महादेव जानकर, मा.शेखरची चरेगावकर मा.आ. दिलीपराव येळगावकर,जिल्हाध्यक्ष विक्रम बाबा पावसकर, मा.मनोज दादा घोरपडे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला,
यावेळी पुसेसावळी ग्रामपंचायतीला सार्वजनिक
विकास कामांसाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही महसुल मंत्री मा.चंद्रकांत दादा पाटील यांनी सरपंच मंगलताई पवार यांना दिली. त्यामुळे येणार्या काळामध्ये खटाव तालुक्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या पुसेसावळी ग्रामपंचायतीमध्ये भाजपा व मित्र पक्षाचा
प्रभाव राहणार हे मात्र नक्की !