पुसेसावळी(प्रतिनिधी) : शासनाच्या आरोग्यविषयक अनेक योजना आहेत परंतु योजनांचा लाभ गरजूं ग्रामस्थांपर्यत पोहचत नाही,आरोग्यशिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्यविषयक लाभ मिळतो असे प्रतिपादन डॉ.जयवंत पाटील यांनी केले.
पुसेसावळी ता.खटाव येथे सह्याद्री हाॅस्पिटल कराड व सावळेश्वर व्यापारी गणेशोत्सव मंडळ यांच्यावतीने आयोजित आरोग्य शिबिरात बोलत होते.यावेळी डाॅ.महादेव थोरात,दत्तात्रय रुद्रुके,अध्यक्ष मयुर रुद्रुके,अमित वीर,प्रदीप राऊत उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री गणेश व धन्वंतरी पुजन करण्यात आले,उपस्थित मान्यवरांचे स्वागत अक्षय वीर यांच्या हस्ते करण्यात आले.
डाॅ.पाटील म्हणाले की धावपळीच्या जीवनात चुकीच्या आहार विहार पध्दतीने आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आजाराला आपण बळी पडतो,वेळच्यावेळी आरोग्य तपासणी करणे काळाची गरज आहे,गरीब गरजूंच्या आरोग्याची मोफत तपासणी होण्यासाठी अशा मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करणे आवश्यक आहे. या शिबिरात मधुमेह,संधिवात,रक्तदाब,दमा,इसी.जी,स्त्रीरोग आदी व्याधीवर मोफत तपासणी व औषधवाटप करुन मार्गदर्शन करण्यात आले.
डॉ जयवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली डाॅ.थोरात व सहकार्यांनी आरोग्य शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.यावेळी सुमारे 130 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.सदगुरु मेडिकल चे अतुलशेठ इनामदार यांच्या वतीने आरोग्य शिबिरासाठी मोफत औषधे उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी मंडळाच्या वतीने गरजूं व होतकरु पंचवीस मुलांना कपडे वाटप करण्यात आले.यावेळी मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल तोडकर यांनी तर आभार सचिन येवले यांनी मानले.