मायणी :- सध्याच्या आधुनिक युगात वाढणाऱ्या सिमेंटच्या जंगलात घटणारे वृक्षांचे प्रमाण लक्षात घेता पृथ्वीचे तापमानाचे,पर्यावरणाचे योग्य संतुलन राखण्यासाठी विविध मंडळे ,युवा ग्रुप तसेच तरुण युवकांनी पुढाकार घेऊन आपले भविष्य आरोग्य आणि सदृढ बनवावे. असे मत मायणी वनक्षेत्राचे वनपाल काश्मीर शिंदे यांनी व्यक्त केले . ते येथील विनायक दुर्गाउत्सव मंडळाकडून करण्यात येणाऱ्या स्मशानभूमी स्वच्छता व वृक्षारोपण कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी मोहन शिंदे, श्री पारधी ,जाधव,एस एस देशमुख सर,सचिन घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. .
सध्या देशभरात जल्लोषात सुरू असलेल्या दुर्गा उत्सवाचा आनंद भाविकभक्त घेत आहे . विविध मंडळाकडून अनेक कार्यक्रमाचे आयोजन यानिम्मिताने करण्यात येत आहे.त्याच प्रमाणे मायणी ता.खटाव येथील विनायक दुर्गाउत्सव व सांस्कृतिक क्रीडामंडळ यांनी समाजाप्रती आपली बांधिलकी जपतांना स्मशानभूमीची स्वच्छता करून याठिकाणी वृक्षारोपणही केले.
दरवर्षी विविध सामाजिक कार्यामध्ये सहभागी असणारे मंडळ म्हणून मायणी येथील विनायक दुर्गा उत्सव व सांस्कृतिक मंडळ क्रीडा मंडळ नावारूपास येत आहे. यंदाचे मंडळाच्या अठराव्या वर्षाच्या निमित्ताने यंदा मायणी – अनफळे रास्त्यावर असणाऱ्या मुख्य स्मशानभूमीचे सध्याचे रूप वाढलेल्या गवतामुळे अडचणीचे झाले होते. याठिकाणी करण्यात येणाऱ्या अंत्यसंस्काराच्यावेळी उपस्थिय नागरिकांची गैरसोय होत होती. यागोष्टीकडे लक्ष देऊन विनायक दुर्गाउत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमी व परिसरात असलेल्या झुडपे ,गवत काढून परिसर स्वच्छ केला तसेच स्मशानभूमीच्या परिसरात वृक्षारोपण केले.
यावेळी मंडळाचे कार्यकर्ते सोमनाथ चव्हाण, अमित माने ,विजय भोंगाळे ,मनोज माने,अविनाश दगडे ,सुनील भोंगाळे, सचिन माने,स्वप्निल भोंगाळे,गणेश वाघ ,अक्षय दगडे,महेश भोंगाळे यांचीही उपस्थिती होती.
सामाजिक कार्यात तरुणाईने पुढाकार घ्यावा – काश्मीर शिंदे ; विनायक दुर्गामाता मंडळाने जपली सामाजिक बांधिलकी ; स्मशानभूमीची स्वच्छता करून केले वृक्षारोपण
RELATED ARTICLES