Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीशिक्षण हे परिवर्तनाचे साधन आहे :- डॉ. न. म. जोशी.

शिक्षण हे परिवर्तनाचे साधन आहे :- डॉ. न. म. जोशी.

पाटण:- सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना फायदाच होत आहे. पंरतु या तंत्रस्नेही शिक्षणामुळे शिक्षणाचा आत्मा विसरू नये. कारण शिक्षण हे परिवर्तनाचे साधन आहे. त्यामुळे समाजाचे परिवर्तन हेे झालेच पाहिजे. असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यीक डाॅ. न. म. जोशी यांनी केले. ते येथील कोयना शिक्षण संस्थेच्या सुर्वणमोहत्सवी वर्ष सांगता समारंभ कार्यक्रमात शिक्षण काल आज आणि उद्या या विषयावर ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमास बडोदा येथील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देषमुख, ज्येष्ठ कवियत्री मीरा चव्हाण, कोयना शिक्षण संस्थेतील अध्यक्ष,डाॅ. सोपानराव चव्हाण उपाध्यक्ष प्रकाषभाऊ पाटील जनरल सेक्रटरी अमरसिंह पाटणकर, जाॅईट सेक्रटरी बाळासाहेब पाटील, ज्येष्ठ सदस्य हणमंतराव जाधव, सदस्य साहेबराव देषमुख, संजीव चव्हाण, पृथ्वीराज पाटील, डाॅ. प्रल्हाद चव्हाण डाॅ. सिमा चव्हाण, डाॅ. सुहास देषमुख आणि सर्व सदस्य, प्राचार्य, डाॅ. एस. डी. पवार कोयना शिक्षण संस्थेतील सर्व शाखामधील मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेत्तर सेवक उपस्थिती होते.
डाॅ. न म जोशी पुढे म्हणाले की, प्राचीन मघ्ययुगीन आणि अर्वाचीन शिक्षणामध्ये प्राचीन कालीन आश्रम शिक्षण पध्दती श्रेष्ठ होती. या शिक्षण पध्दतीत श्रमप्रतिष्ठेला महत्व होते विद्यार्थी सतत ज्ञानाचा विचार करत असे. मध्ययुगीन शिक्षण पध्दतीत धार्मिकेतेचा प्रभाव होता. तर आर्वाचीन शिक्षण प्रणालीवर आंग्लविद्येचा पगडा होता. याचा फायदा असा झाला की इंग्रजी भाषेमुळे भारतीयांना पाष्यात्य देषातील घडामोडी समजल्या आणि त्याचा उपयोग आपला समाज कसा सुधारेल यासाठी करू लागले. आज शिक्षणामध्ये पंचनिष्ठा आवष्यक आहे विद्यार्थी ज्ञान व्यवसाय,समाज आणि राष्ट्र यानिष्ठेमुळे परिर्वतन होईल आणि आदर्ष व शक्तीषाली भारत निर्माण होईल असे विचार व्यक्त केले.
व्दितीय सत्रामध्ये ‘ आजचे शिक्षण उत्तम नागरीक बनविन्यात अपयषी ठरतय काय?’ याविषयावर बोलताना लक्ष्मीकांत देषमुख म्हाणाले की, सामाजातील समस्यांना शिक्षणाने उपाय दिले नाहीत .अत्याचार, बलत्कार, लैगीक शारिरीक हिंसा धर्मभेद जातीभेद हे वाढतच आहे. देषातील अल्पसंख्याकांना असहिष्णूतेची वागणूक मिळत आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होवून असूरक्षितेची भावना देशामध्ये निर्णाण होत आहे. आर्थिक सामाजिक विषमता निर्णाण झाल्यामुळे सामाजिक अषांतता निर्माण झाली आहे. याच्या वरती उपाय म्हणजे सर्वाना समान शिक्षण मिळाले पाहिजे. देषप्रेम, सर्वघर्म समभाव जातीय भेदभाव विसरून विद्यार्थ्यांना आदर्ष नागरीक बनविणे आज काळाची गरज बनली आहे.मूल्य विवके मूल्यभान मुल्य संस्कार वैज्ञानिक दृष्टीकोण त्याच बरोबर आधुनिक मुल्याची जोपासणा केली पाहिजे. शिक्षक महान झाला तर देश महान होईल प्रत्येकाने स्वप्न मोठी स्वप्न पहावीत ती स्वप्ने सत्यात उतरविण्याचा प्रत्यन करावा याचासाठी वाचन संस्कृतीची जोपासावी असे विचार व्यक्त केले.
कोयना षिक्षण संस्थेतील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थीनींचा सत्कार प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केायना शिक्षण संस्थचे जनरल सेक्रेटरी अमरसिंह पाटणकर यांनी केले. अहवाल वाचन संस्थचे अध्यक्ष डाॅ. सोपानराव चव्हाण यांनी केले तर आभार महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एस. डी पवार यांनी मानले सुत्रसुचालन डाॅ. दिपक डांगे पाटील, प्रा. विनायक राऊत प्रा. पौर्णिमा मोरे यांनी केले.

 

 

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular