सातारा दि : कोरोनाचे संकट गडद झाले आहे. मदतीचा ओघ सुरू असूनही मदत अपुरी पडत आहे. शिधा वाटप पत्रिका असूनही शिधा मिळत नाही. तिथे बेघरांची अवस्था बिकट झाली आहे. अशा वेळी भिम सैनिक वसंत ओव्हाळ यांनी घासातील घास देऊन बुद्ध जयंती साजरी केली. त्यांचे आता सातारा जिल्ह्यात सर्वजण कौतुक करीत आहेत.
गेली सव्वा महिना सातारा शहरानजिक असलेल्या राष्ट्रीय महामार्ग पुलाखाली तीस ते पस्तीस कुटूंब पाल टाकून राहत आहेत. युगपुरूष, देव -देवता,खेळण्यातील किल्ले बनवून उदरनिर्वाह करणारे हे परप्रांतीय उपाशीपोटी आहेत. ज्या देव -देवतांची देवाऱ्यात पूजा -अर्चा केली जाते. ते देव घडविणारे हात भिक्षा मिळविण्यासाठी लाजत आहेत. त्यांची लहान मुले भुकेने व्याकूळ झाल्याचे पाहुन खेड येथील प्रतापसिंह नगरातील भिम सैनिक वसंत ओव्हाळ अस्वस्थ झाले होते. त्यांनी घरातील मंडळी साठी आणलेले ज्वारीचे पीठ व इतर साहित्य घेऊन तडक पालातील गरीब परप्रांतीयांना वाटून टाकले.
१९७२ च्या दुष्काळाने उस्मानाबाद येथून आलेले ओव्हाळ कुटूंबानी साताऱ्यातील हजेरी माळ येथे पाल टाकून आश्रय घेतला होता. मोलमजुरी करूनही उपासमारीचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे परस्थिती ची जाणीव ठेवून त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. बुद्ध जयंतीनिमित्त त्यांनी पोलीस बंदोबस्त व लॉक डाउन झुगारून त्यांनी माणुसकी राखण्याचे काम प्राधान्याने केले आहे. गोर गरिबांना मदत करण्यासाठी त्यांनी दुचाकीवरून पीठ व इतर साहित्य आणले.शारीरीक अंतर राखण्याची सूचना करून त्यांनी सर्वाना मदत केली. रिपाइं चे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, संतोष व राजेंद्र आणि किरण यांचे वडिल तसेच आनंद तथा बाबा ओव्हाळ यांचे चुलते असलेल्या भिम सैनिक वसंत ओव्हाळ यांनी घरातील लोकांनाही तशीच शिकवण दिली आहे. या संकटसमयी बाबासाहेबांची लेकरं उपाशी झोपणार नाही. याची जबाबदारी म्हणून समाज बांधवावर अधिक आहे. त्यांनी यथाशक्ती गोर गरिबांना मदत केली पाहिजे. आपण कोणावर उपकार करीत नसून मानवता धर्म पाळत आहे असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांच्या या विधायक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
घासातील घास देऊन भिम सैनिकांनी साजरी केली बुद्ध जयंती
RELATED ARTICLES